"दैनिक भास्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "भास्कर" हे पान "दैनिक भास्कर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
दैनिक भास्कर हे हिंदी भाषेतले एक अग्रगण्य दैनिक आहे. हे भारतातील ६४ शहरांतून एकाच वेळी प्रसिद्ध होते. त्याच्या मराठी आवृत्त्या दिव्य मराठी या नावाने, महाराष्ट्रातील औरंगाबाद, नाशिक आणि जळगांव या ठिकाणाहूनठिकाणांहून प्रकाशित होतात. कुमार केतकर हे मराठी आवृत्त्यांचे मुख्य संपादक कुमारआहेत. केतकरगुजराथी हेआवृत्ती दिव्य भास्कर या नावाने आहे. दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष आहेत रमेशचंद्र अग्रवाल.(इ.स.२०११). मुख्य कार्यालय मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे.
 
==इतिहास==
 
दैनिक भास्कर पहिल्यांदा भोपाळमधून 'सुबह सवेरे' या नावाने १९५६ मध्ये, आणि 'गुड मॉर्निंग इंडिया' या नावाने १९५७ पासून ग्वाल्हेरमधून प्रकाशित होऊ लागले. दोन्ही आवृत्त्या हिंदी होत्या. वृत्तपत्राचे नाव १९५८ मध्ये 'भास्कर समाचार' झाले आणि नंतर 'दैनिक भास्कर'. आज दैनिक भास्कर हे खपाच्या बाबतीत भारतातले पहिल्या क्रमांकाचे आणि जगातले अकराव्या क्रमांकाचे दैनिक वृत्तपत्र आहे.
 
==मध्य प्रदेशाबाहेर==
 
दैनिक भास्करने मध्य प्रदेशाबाहेर जाऊन जयपूरमधून आपली आवृत्ती प्रसिद्ध करायचा विचार केला. त्यांचे ध्येय फक्त ५०,००० प्रतींचे होते. पण खपाचा पूर्वअंदाज घेण्यासाठी ७०० स्वयंसेवकांनी हातात दैनिक भास्करच्या प्रस्तावित आवृत्तीची एक नमुना प्रत दाखवून जयपूर शहरात आणि परिसरातील, दोन लाख कुटुंबांना भेटी देऊन सर्वेक्षण केले. आगाऊ वर्गणी भरली तर वृत्तपत्र दोन रुपयांऐवजी दीड रुपयाला देण्याचे आणि पसंत न पडल्यास पैसे वापस करण्याचे आश्वासन दिले. परिणाम असा झाला की, आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १९ डिसेंबर १९९६ रोजी दैनिक भास्करच्या जयपूरमध्ये तब्बल १,७२,३४७ प्रती खपल्या. त्या शरातील 'राजस्थान पत्रिका' या आघाडीच्या वृत्तपत्राचा खप त्या काळी मात्र एक लाख प्रती इतका होता. त्याहून जास्त प्रती खपवण्याचा नवा उच्चांक दैनिक भास्करने प्रस्थापित केला.