"दिवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १७:
*
==दिवे आणि संस्कृती==
दिव्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेत महत्वाचे स्थान आहे.खाद्यतेल वापरून प्रकाशमान होणारा पणती हा भारतातील पारंपारीक दिवा अधिक प्रकाश देणार्या इतर साधनांच्या उपलब्धते नंतर कमी वापरला जाऊ लागला तरी त्याचे परंपरेतील स्थान अभाधीत राहीले आहे.देवघर,देव्हारे,तुळशी वृंदावन,स्वागत कमानी आणि दरवाजांचे कोनाडे इत्यादी ठिकाणी पणत्या लावल्या जातात.सायंकाळच्या वेळी दिवा लावल्या नंतर दिव्यास नमस्कार करण्याची प्रथाही असे.तसेच महाराष्ट्रात घरोघरी सायंकाळी म्हणावयाच्या शुंभकरोती प्रार्थनेत सुद्धा दिव्याचा उल्लेख असतो. पणत्यांचा उपयोग आरती तसेच ओवाळताना सुद्धा केला जातो.त्याकरीता बर्याचदा पिठाच्या पणत्या सुद्धा वापरण्याची सुद्धा परंपरा आहे. ठरावीक सणाच्या दिवशी पणत्या नदी अथवा तलावात सोडण्याची परंपरासुद्धा आढळून येते. त्या शिवाय दिपावली इत्यादी सणाच्या वेळी पणत्या ओळीने अथवा विशीष्ट रांगेने लाऊन पारंपारीक रोषणाई केली जाते.
देवघर आणि मंदीरातून, पितळे चांदी इत्यादी धातूच्या समई देखील वापरल्या जातात.अहोरात्र जळणार्या समईस नंदादीप असे म्हणतात.कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी समईचे प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात करण्याची परंपरा आहे.
|