"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''मदर इंडिया''' हा इ.स. १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील चित्रपट होता. सार्वकालिक उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. त्यातल्या आदर्शवादी भूमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप ठेवली. याचे दिगदर्शन मेहबूब खान यांनी केले ह्प्ते.. चित्रपटाची कथाही मेहबूब खान यांनी लिहिली होती.
 
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी इ.स. १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भूमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
हा चित्रपट भारतातर्फे ऑस्कर अ‍ॅकॅडमी पुरस्काराच्या विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. तो पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.
 
=कथा=
 
कथानक राधा या स्त्रीभोवती फिरते. मेहबूब खान यांच्या मते ती स्वातंत्र्योत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते, म्हणून त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. नवीन बांधून झालेल्या कालव्याचे उद्‌घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते हा चित्रपटाच्या सुरुवातीला प्रसंग. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तिची गोष्ट पडद्यावर साकारते.
 
ओळ ३६:
 
तत्कालीन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका सुशीलाराणी पटेल या बाबूरावांच्या तृतीय पत्नी.
 
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट नामसूची]]