"मदर इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Vishal1306 (चर्चा | योगदान) नवीन पान: ==मदर इंडिया== मदर इंडिया हा १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्र... |
Vishal1306 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ २:
मदर इंडिया हा १९५७ साली प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट होता. सार्वकालिक उत्कृष्ट भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. त्यातल्या आदर्शवादी भुमिकेमुळे चित्रपटाने प्रचंड यश मिळवलेच पण समाजमनावरही छाप सोडली. याचे दिगदर्शन मेहबुब खान यांनी केले. चित्रपटाची कथाही मेहबुब खान यांनी लिहली.
याच कथेवर आधारित औरत नावाचा चित्रपट त्यांनी १९४० सालीही बनवला होता. मदर इंडिया हा याच चित्रपटाचा यशस्वी रिमेक होता. यात प्रमुख भुमिकांत नर्गिस , सुनील दत्त, राजेंद्र कुमार, राजकपूर हे होते. चित्रपटाला संगीत नौशाद यांनी दिले होते. तर गाणी लता मंगेशकर , शमशाद बेगम, महम्मद रफी, मन्ना डे यांनी गायली होती.
हा चित्रपट भारतातर्फे अकादमी पुरस्कार (ऑस्कर) - विदेशी भाषा विभागासाठी पाठवण्यात आला होता. ऑस्कर पुरस्कार हुकला असला तरी, ऑस्कर नामांकन मिळवणारा तो पहिला भारतीय चित्रपट होता.
=कथा=
कथानक राधा या स्त्री भोवती फिरते. मेहबुब खान यांच्या मते ती स्वातंत्रोत्तर काळातील आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. म्हणुन त्यांनी चित्रपटाचे नावही मदर इंडिया असे ठेवले. चित्रपटाच्या सुरवातीला प्रसंग येतो नवीन बांधुन झालेल्या कालव्याचे उत्घाटन बुजुर्ग राधाच्या हस्ते होते. याचवेळी राधाला आपल्या आयुष्याचा प्रवास आठवतो. आणि तीची गोष्ट फ्लॅशबॅक द्वारे उलगडते. शामु सोबत नवीन लग्न होउन राधा गावात येते.
==कलाकार व भुमिका==
* नर्गिस --- भुमिका : राधा
* सुनील दत्त --- भुमिका : बिरजू
* राजेंद्र कुमार --- भुमिका : रामु
|