"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Cybertraker (चर्चा) यांनी केलेले बदल Mahitgar यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास ने�
ओळ ३:
|नाव = कान्होजी आंग्रे
|चित्र =Kanhoji Angre.jpg|
|चित्र_रुंदी =
|चित्र_आकारमान =150px
|चित्र_शीर्षक = योहानेस श्टार्क यांचे १९१९ मधील छायाचित्र.
|चित्रशीर्षक = कान्होजी आंग्रे यांचे काल्पनिक चित्र.
|जन्म_दिनांक = [[इ.स. १६६९]]
|मृत्यू_दिनांक = [[जुलै ४]], [[इ.स. १७२९]]
ओळ १४:
}}
 
सरखेल '''कान्होजी आंग्रे'''. (ऑगस्ट १६६९ ते ४ जुलै १७२९). सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे <s>नामवंत</s>(विशेषणाचा अविश्वकोशिय उपयोग) प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे काबीज करुन आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता होती. या सागरी व्यापारांचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी कील्ले काबीज करणेही आवश्यक होते.{{संदर्भ हवा}} कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपुर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला.{{संदर्भ हवा}} परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता.<s> १६ व्या शतकात कुंजली मरक्कर यांनीही परकीय सत्तेविरुद्ध असाच पराक्रम गाजवला होता.</s>(विश्वकोशीय उल्लेखनीयता ?) इंग्रज आणि पोर्तुगिज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.
 
==उगम==
 
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटूंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मुळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे पालक{{क्लिष्ट भाषा)) होत. त्यांच्या वडीलांचे नाव तुकोजी आणि आईचे नाव अंबाबाई होते. बराच काळ त्यांना मुलबाळ न झाल्याने अंबाबाईने कानिफनाथाचा नवस केला की तुझ्या अंगाऱ्याच्या आशिर्वादाने आम्हाला मुल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेऊ.{{संदर्भ हवा}} त्यांच्या बालपणाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणा पासूनच समुद्र सफरींची आणि साहसी मोहीमांची आवड होती.
 
१६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, मुंबई पासून विंगोरीया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजीरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दिची सुरुवात ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केला. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटीशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.
 
१७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू{{संदर्भ हवा}} (तथ्य तपासा ?) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणाऱ्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.
 
कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहीमेविरुध्द लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.
ओळ ३०:
* मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करुन कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला.
* १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली.
* अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभुमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.{{संदर्भ हवा}}
 
==मोहिमा==
ओळ ३९:
 
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पुर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली.
२९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगिज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने,कमांडर थॉमस मॅथ्युज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह संयुक्त मोहिम, कान्होजींविरुध्द हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पुर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये थॉमसइंग्लंडला परतले.{{अपूर्णवाक्य}}( नेमके मॅथ्युजकोण इंग्लंडला परतले. ?) त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यान{{काल सापेक्षता}} गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्युपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.
 
==प्रमुख लढाया==
ओळ ५२:
* १७२० – ब्रिटीशांचा घेरीया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
* १७२१ – अलिबागवर ब्रिटीश आणि पोर्तुगिज आरमाराचा हल्ला असफल.
* १७२३ – ईगल आणि हंटर या दोन ब्रिटीश जहाजांवर हल्ला.{{संदर्भ हवा}}
 
==मृत्यु==
ओळ ६२:
==वारसा==
 
कान्होजींच्या काळात त्यांनी विदेशी सत्तांना सागरी किनाऱ्यावर मोठे आव्हान निर्माण केले होते. ब्रिटीश आणि पोर्तुगिज आरमाराचे त्यात प्रचंड नुकसान झाले. भारतातील त्यांच्या वाढत्या वर्चस्वावर त्यांनी अंकुश लावला.<s> दुर्दैवाने कान्होजींच्या मृत्युनंतर त्यांच्या एवढा शुर आणि यशस्वी दर्यावर्दी भारतात निर्माण झाला नाही आणि ब्रिटीशांनी हळूहळू पुर्ण भारताचा कब्जा घेतला.</s> {{व्यक्तिगतमत?}}{{अविश्वकोशीय उल्लेख}}
 
वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते.{{व्यक्तिगतमत?}} त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्या कडे ब्रिटीशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते.{{संदर्भ हवा}} त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.{{व्यक्तिगतमत?}} आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.{{संदर्भ हवा}}
 
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटीश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवा प्रित्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.
Line ७३ ⟶ ७४:
* खांदेरी बेटावरील ओल्ड केनेरी दीपगृहाचे कान्होजी आंग्रे दीपगृह असे करण्यात आले आहे.
* राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टीलायजर्स च्या निवासी कॉलनीचे नामकरण सर्खेल कान्होजी आंग्रे नगर असे करण्यात आले आहे.
* २००७ च्या “पायरेट्स ओफ द कॅरीबियन – एट द वर्ल्ड्स एन्ड” या इंग्रजी चित्रपटात “श्री संभाजी आंग्रीया” हे नऊ कुप्रसिद्ध सागरी चाच्यांपैकी एक दाखवले आहेत. कान्होजी आंग्रेवरूनच हे नाव त्यांनी उचलले असेल यात शंकाच नाही..{{व्यक्तिगतमत?}}