मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृध्द आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून[[सातवाहनां]]पासून [[यादव]] काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या.
मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.प्रतिष्ठाननगरी[[प्रतिष्ठान]]नगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या[[वेरुळ]]च्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी[[वाकाटकां]]नी राज्य केले. त्यानंतर इथे [[बदामीच्या चालुक्यांचीचालुक्यां]]ची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इ.स. ५५० ते ७५० अशी टिकली. [[ह्यू एन त्संग]] याच काळात मराठवाड्यात आला होता. त्यानंतर इथे राष्ट्रकुटांची[[राष्ट्रकुटां]]ची सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे [[चालुक्य]] कल्याणी. हे सरधारणत: १० वे ११ वे शतक नंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ती कलचुरींची[[कलचुरीं]]ची.