"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ ३:
== गोविंदप्रभू चरित्रलीळा ==
{{बदल}}
ज्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातून [[लीळाचरित्र]] हे चक्रधरस्वामींचे चरित्र प्रकटले आहे, त्याप्रमाणे लीळांच्या माध्यमातूनच श्री प्रभूंचे चरित्रही प्रकटलं आहे. या ग्रंथाचे नाव आहे ऋद्धिपूरलीळा किंवा श्री गोविंदप्रभू चरित्र लीळा. या ग्रंथात 'राऊळ वेडे : राऊळ पिके' असा उल्लेख त्यांच्याविषयीच्या अनेक लीळांत आला आहे. सांप्रदायिक मान्यतेनुसार त्यांच्यामधील दैवी शक्तीही गृहीत धरावी लागते. असे असूनही त्यांच्याविषयीचे जे प्रसंग त्यांच्या या चरित्रग्रंथात वर्णिले आहेत, त्यांच्यामधून त्यांच्या माहात्म्याच्या खुणा प्रकटल्याशिवाय राहत नाहीत {{संदर्भ हवा}}. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी व समाजाच्या कल्याणासाठी व्यतीत केले {{संदर्भ हवा}}. परोपकार हा त्यांचा स्थायिभाव होता {{संदर्भ हवा}}. ऋद्धिपूरलीळेतील दोन-तृतीयांशांहून अधिक लीळांतून गोविंद प्रभूंची परोपकारी वृत्ती प्रकटते. त्यांनी कार्यातून समाजाच्या सर्व घटकांतील लोकांच्या कल्याणाची कामनाच अभिव्यक्त होते.<ref>
स्त्री आणि शूद्र यांनाही समाजातील अन्य घटकांप्रमाणेच उपासना व भक्ती करून आपला उद्धार करुन घेण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला पटवून दिलं. त्यांच्या स्त्री-शिष्यांना 'श्री प्रभू राऊळ माए : राऊळ बापो' असे वाटे. या लीळांमध्ये
{{दृष्टिकोन}}
केशवनायकासारख्या यादवकालीन उच्च अधिकार्याच्या पव्हेचे उदकपान करणारे गोविंद प्रभू मातंग पव्हेचं उदकपानही आवडीने करतात. उपासन्याघरी खाजे (खाद्य) आरोगण करतात. तसेच सामान्य स्त्रियांचे अन्न खाताना ते संकोचत नाहीत. मातंगाच्या घरचे अन्नही ते आवडीने खातात. शिंपी काय, माळी काय, गवळणी काय आणि तेलिणी काय, समाजाच्या सर्व थरांतील, व्यक्ती त्यांना एकसारख्यायच समान वाटतात. त्यांच्याबरोबर राहणे-वागणे, हसणे-बोलणे, खाणे-पिणे याविषयी त्यांना कोणताच विधिनिषेध वाटत नाही.
वरील सर्व बाबी लक्षात घेता गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील आद्य समाजप्रबोधनकार होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.<ref>
== संदर्भयादी ==
{{संदर्भयादी}}
|