"विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१ मार्च २०११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१ मार्च २०११" सुरक्षित केला ([edit=autoconfirmed] (अनंत) [move=autoconfirmed] (अनंत))
छोटा केला.
ओळ ६:
 
या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा [[बालेकिल्ला]] आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे [[मंदिर]] व [[जिजाबाई]] व बाल-शिवाजी यांच्या [[प्रतिमा]] आहेत.या किल्ल्याचा आकार [[शंकर|शंकराच्या]] पिंडीसारखा आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
 
सातवाहनांनंतर शिवनेरी [[चालुक्य]], [[राष्ट्रकूट]] या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक – उल – तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे [[किल्ला]] बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक – उल – तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून [[अहमदनगर]]ला हलवण्यात आली. [[इ.स. १५६५]] मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. [[जिजाबाई|जिजामाता]] गरोदर असताना जाधवरावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. ''शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर [[शिवाजी]]राजे यांचा जन्म जाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार''. इ.स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. १६७८मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.
 
'''([[शिवनेरी|पुढे वाचा...]])'''
 
 
<noinclude>