"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच वनपस्तीजीवनास हानिकारक असते.
हा क्षार शरिराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील चयापचयासाठी व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व पित्त बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरिरातील आम्ल संतुलित राहते व मज्जारज्जू व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरिरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो, त्वचा ढिली पडते, पोटर्यामध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, रक्ताच्या गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, हाडे कमकुवत होतात, चेहर्यावर सुरकुत्या पडतात, केस पांढरे होतात, [[मुत्रपिंड|मुत्रपिंडाचे]] कार्य वाढते हात, पाय चेहरा पोट यावर सूज येते. मीठाचे प्रमाण आहारात चवीपुरताच असावे.
==
समुद्र किनारी वाफे तयार करुन त्यात समुद्राच पाणी साठवल जात. सूर्याच्या उण्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली रहाते. मीठ तयार करणार्या अशा जागांना मिठागरे असे म्हणतात.
|