"गंमत जंमत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: en:Gammat Jammat
छो Typo fixing, replaced: करुन → करून (2) using AWB
ओळ ३६:
 
==कलाकार==
*[[अशोक सराफ]] = फाल्गुन <BR>
*[[सचिन पिळगांवकर]] = गौतम <BR>
*[[वर्षा उसगावकर]] = कल्पना <BR>
*[[चारुशिला साबळे]] = अश्विनी <BR>
*[[सुधीर जोशी]] = श्रीकांतचा मामा <BR>
*[[श्रीकांत मोघे]] = दादासाहेब कोरडे <BR>
*[[आशालता वाबगावकर]] = कल्पनाची आई <BR>
*[[विजू खोटे]] = गणू पैलवान <BR>
*[[चेतन दळवी]] = श्रीकांत <BR>
==पार्श्वभूमी==
पैशाची चणचण असलेल्या दोन मित्रांना झटपट पैसा मिळविण्यासाठी 'श्रीमंताची मुलगी खंडणीसाठी पळवून नेण्याची' दुर्बुद्धी होते आणि ती कल्पना प्रत्यक्षात आणल्यावर त्यांना चांगलीच महागात पडून त्यातून कोणत्या गंमतीजंमती घडतात ते या चित्रपटात पहावयास मिळते.
ओळ ६२:
ठरल्यानुसार ते कल्पनाला पळवून नेतात आणि गौतम रहात असलेल्या बंगल्यात आणून ठेवतात. आता कल्पना घाबरेल आणि तसेच तिचे वडिलही आणि लगेच आपल्याला मागितलेली रक्कम ते देतील अशी स्वप्नं रंगविणार्‍या गौतम आणि फाल्गुनवर त्यांची ही शक्कल चांगलीच बूमरॅंग होते! कल्पना ही एक स्मार्ट,बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलंय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असलं काहितरी सनसनाटी 'थ्रिल' तिला हवंच होतं असं ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असंही ती त्यांना सुनावते. आता गौतम-फाल्गुन होते साधे-सामान्य! सराईत गुंडगिरी, मारामारी इत्यादीशी काडीचाही संबंध नसलेले आणि किडनॅपिंगच्या क्षेत्रात नवखे! स्मार्ट कल्पनाला त्या दोघांनाही 'गुंडाळून' ठेवणं त्यामुळे सहजशक्य होतं. इकडे दादासाहेब कोरड्यांनाही गौतम-फाल्गुनच्या धमक्या देण्याच्या पद्धतीवरुन त्यांचा नवखेपणा ओळखता येतो आणि ते ही मागितलेली रक्कम द्यायला टंगळमंगळ करतात. तेव्हढ्या वेळात कल्पनाला शोधून काढायचं काम ते पोलिसांऐवजी गणू पैलवानवर सोपवतात.
 
दरम्यान कल्पना त्या बंगल्यामध्ये गौतम-फाल्गुनकडून स्वत:ची चांगलीच बडदास्त ठेवून घेते. मध्येच एकदा श्रीकांतचा मामा किंवा गौतमच्या ओळखीचे पोलिस इन्स्पेक्टर किंवा फाल्गुनच्या शोधात आलेली अश्विनी इत्यादिं व्यक्ति जेव्हा बंगल्यात येतात तेव्हा कल्पना दरवेळेस वेगवेगळी नाटके करुनकरून वेळ मारुन नेते. त्यामुळे तिला पळवून आणले आहे असा कोणालाही संशय येत नाही. कल्पनाचे वाढते नखरे आणि मागण्या आणि रक्कम सांगूनसुद्धा ती वेळेवर न देणारा तिचा कंजूस बाप यांच्या कात्रीत दोघेही सापडतात. दोघंही अतिशय जेरीस आलेले असताना एक दिवस गौतमला श्रीकांतकडून पत्रं येतं. त्यातून श्रीकांत कळवतो की त्याने गौतम आणि फाल्गुनसाठी दिल्लीला चांगल्या पगाराच्या नोकर्‍या बघून ठेवल्या आहेत. हे ऐकल्यावर दोघांचाही आनंद गगनात मवेनासा होतो. आता कल्पनाचे नखरे सहन करण्याची किंवा तिच्या वडिलांकडून अपेक्षित असलेल्या रकमेची त्यांना आवश्यकताच उरत नाही आणि आता ते अजिबात कल्पनाच्या मागण्यांना भीक घालत नाहीत.
 
इकडे,आतापर्यंत दोघांना भंडावून सोडणारी कल्पना नकळत गौतमच्या प्रेमात पडलेली असते. त्याचा साधा-सरळ स्वभाव तिला आवडलेला असतो आणि तिला पळवून नेण्यामागचं खरं कारण समजल्यावर तिला त्याचा रागही येत नाही. अर्थात हे ती त्याला आधी सांगत नाही. पण जेव्हा गौतम तिला सांगतो की तू आता मोकळी आहेस आणि आता तिची त्या दोघांना गरज नाही, तेव्हा मनातून थोड्या दुखावलेल्या कल्पनाला तिच्या प्रेमाची कबुली देणं भाग पडतं. हे समजल्यावर गौतमही तिच्या प्रेमाचा स्वीकार करतो.
 
आता कल्पना तिच्या घरी आणि गौतम-फाल्गुन दिल्लीला जायची तयारी कारण्यासाठी निघतात. तेव्हढ्यात गणू पैलवान त्यांचा पाठलाग करतो आणि सरतेशेवटी त्या सर्वांना दादासाहेबांच्या पुढ्यात हजर करतो. तिथे कल्पना गौतमची ओळख त्यांचा भावी जावई म्हणून करुनकरून देते. अर्थात गौतम जे घडलेलं असतं ती सत्यघटना कथन करतोच. पण शेवटी त्यांच्या प्रामाणिकपणावर खूष होऊन दादासाहेब या लग्नाला परवानगी देतात.
 
==उल्लेखनीय==
ओळ ७६:
 
हिंदीतील नामवंत गायक किशोर कुमार यांनी या चित्रपटा्द्वारे मराठीमध्ये प्रथमच पार्श्वगायन केले होते.
 
[[वर्ग:इ.स. १९८७ मधील मराठी चित्रपट]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/गंमत_जंमत" पासून हुडकले