"प्रभाकर पणशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २५:
| पत्नी_नाव = विजया कुलकर्णी
| अपत्ये = जान्हवी पणशीकर, रघुनंदन पणशीकर
| संकेतस्थळ = http://http://www.natyasampada.com/
| तळटिपा =
}}
ओळ ३९:
मात्र लहानग्या प्रभाकरचा ओढा मात्र नाट्यक्षेत्राकडे होता. शाळेत असताना वेगवेगळ्या प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. एवढेच नव्हे तर ती नाटके पुढे गिरगावात गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे पौगंडावस्थेतच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. १३ मार्च [[इ.स. १९५५|१९५५]] ह्या दिवशी ’राणीचा बाग’ ह्या नाटकाद्वारे प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक [[मो.ग.रांगणेकर|मो.ग.रांगणेकरांच्या]] ’नाट्यनिकेतन’ संस्थेत प्रवेश केला आणि ’कुलवधू’, ’भूमिकन्या सीता’, ’वहिनी’, ’खडाष्टक’ अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.
 
== तो मी नव्हेच==
१९६२ साली रांगणेकरांनी जेव्हा अत्र्यांचे ’तो मी नव्हेच’ हे नाटक सादर करायचे ठरवले तेव्हा पंतांनी सुचवलेली अन्य नटांची नावे धुडकावून रांगणेकरांनी पंतानाच मुख्य भूमिका करण्याची गळ घातली. पंतानी ती अर्थातच मान्य केली आणि १५ ऑगस्ट १९६२ ला ’तो मी नव्हेच’ चा मुहूर्ताचा प्रयोग झाला. या नाटकात पंतांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजीशास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशा पाच वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तीच्या भूमिका काही क्षणांत भूमिकाबदलासह साकारायचे शिवधनुष्य लीलया पेलले. रसिकांचे पराकोटीचे प्रेम आणि किर्ती पंतांना ’तो मी नव्हेच’ ने मिळवून दिली.
 
==नाट्यसंपदा==
पुढे मो.ग.रांगणेकरांशी मतभेद झाल्यानंतर पंत ’नाट्यनिकेतन’ मधून बाहेर पडले आणि ’अत्रे थिएटर्स’मधून ’तो मी नव्हेच’चे प्रयोग सादर करु लागले. आपले स्नेही [[मोहन वाघ]] आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने त्यांनी १९६३ साली ’नाट्यसंपदा’ ह्या संस्थेची स्थापना केली. [[विद्याधर गोखले]] लिखीत ’अमृत झाले जहराचे’ आणि [[वसंत कानेटकर]] ह्यांचे ’मोहिनी’ अशी दोन नाटके ’नाटयसंपदे’ने रंगमंचावर आणली. दुर्दैवाने ती फारशी चालली नाहीत.
 
मात्र त्यानंतरच्या ’मला काही सांगायचंय’ आणि विशेषत: ’इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकांच्या निर्मीतीने ’नाट्यसंपदे’ला स्थैर्य, आर्थिक यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ’कट्यार काळजात घुसली’ ह्या सुप्रसिद्ध संगीत नाटकाने तर इतिहास घडवला. १९७० ला ’तो मी नव्हेच’ हे हक्क ’नाट्यसंपदे’ने विकत घेऊन पुढे पंतांनी ह्या नाटकाचे २०००हून अधिक प्रयोग केले.
==अभिनय==
*तो मी नव्हेच,(लखोबा लोखंडे)
*इथे ओशळला मृत्यु,
*अश्रुंची झाली फुले,
*थँक यु मि. ग्लाड,
*जेव्हा गवताला भाले फुटतात,
*भटाला दिली ओसरी,
 
==अभिनीत नाटके==
==प्रमुख नाट्यनिर्मीती==
*तो मी नव्हेच,(लखोबा लोखंडे)
*इथे ओशळला मृत्यु,
*अश्रुंची झाली फुले,
*थँक यु मि. ग्लाड,
*जेव्हा गवताला भाले फुटतात,
*भटाला दिली ओसरी,
 
==प्रमुख नाट्यनिर्मीती==
*संगीत मदनाची मंजिरी
*संगीत सुवर्ण तुला