"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो 124.124.82.154 (चर्चा) यांनी केलेले बदल 117.204.168.156 यांच्या आवृत्तीकडे पूर्�
ओळ १:
pra.ke.atre. is good writer. -o
 
एकच प्याला तील गडकर-यांचा विनोद.
 
"एकच प्याला"तील तळीराम दारु पिण्याचे जे समर्थन करतो ते मोठे मासलेवाईक आहे. तो म्हणतो-
"दारु एकदा घेतली म्हणजे ती सुटत नाही,पण तेवढ्याने दारु वाईट कशी ठरते ? विश्वविद्यालयाची एकदा पदवी मिळवली म्हणजे ती जन्माची चिकटते. एकदा नुसती माळ घातली की बायको कायमची बिलगते.मग पदवीला न बायकोला जर लोक वाईट समजत नाहीत तर दारुलाच तेवढे लोक वाईट का समजतात ? प्रेमाचे दुष्परिणाम तर दारुपेक्षा वाईट असूनसुद्धा प्रेमाला जगात काय भाव आला आहे. ? प्रेमात राजासुद्धा गुलाम होतो,पण मदिरेत गुलामाला आपन राजा आहोत असे वाटते.प्रेमामुळे काही सुचेनासे होते-तर मदिरेमुळे कल्पनाशक्ती अनिवार वाढते.लोक म्हणतात,मद्यपान हे अनीतिकारक आहे. साफ खोटे. मद्यपान नीतिमत्तेला फार पोषक आहे.मद्यपी कधी खोटे बोलत नाही. कारण खोटे रचून त्याला सांगताच येत नाही. तो कधी कोणाचा विश्वासघात करी नाही. कारण त्यावर कोणी विश्वास ठेवीत नाही.चोरीच्या बाबतीत तर तो अजाण असतो. एखादी लहानशी गोष्टसुद्धा त्याला दुस-याजवळून चोरुन ठेवता येत नाही"
 
त्यावर भगीरथ तळीरामाला विचारतो,"दारु जर इतकी चांगली आहे असे तुम्ही म्हणता, तर मग तिची जगात एवढी निंदा का होते ?"
 
त्याला तळीराम उत्तर देतो की, "मद्यपान हे बहुतांशी हलक्या लोकांच्या हाती गेल्यामुळे संभावित समाजाकडून दारुची हेटाळणी होते असते. ती बंद व्हावी आणि मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी सर्व धर्माच्या, सर्व जातींच्या आणि पोटजातींच्या दारु पिणा-यांचे एक "आर्य मदिरा मंडळ" काढण्याचे आपण ठरविले आहे"
 
या मंडळाच्या नावाबद्दल आणि उद्देशाबद्दल तळीरामाने जे टाचण केलेले आहे त्यातला उपरोध आणि उपहास अतिशय मार्मिक आहे-
 
"मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरुप यावे एवढ्यासाठी संस्थेच्या नावात "आर्य" हा शब्द घालण्यात आलेला आहे.मंडळाच्या प्रत्येक सभासद दारु पिणारा आणि आपण दारु पितो हे चारचौघात बोलून दाखविणारा असा पाहिजे. मांसाहाराला हे मंडळ उत्तेजन देते. साडेआठला दारुची दुकाने बंद होतात. तो कायदा मोडून सर्रास अहोरात्र ती दुकाने उघडी ठेवावीत एवढ्यासाठी हे मंडळ सरकारला विनवण्या करीत राहणार.बिनवासाची प्यायची दारु शोधून काढण्यासाठी हे मंडळ शिष्यवृत्ती देऊन विद्यार्थ्यांना परदेशी पाठवणार. प्रत्येक सभासदाने नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा जारीने प्रसार करावयाला हवा.त्याप्रमाणे व्यसने सोडण्याचे आजकाल समाजात जे खूळ बोकाळले आहे, कोणी चहा सोडतो,कोणी विडी सोडतो,त्या खुळाला या मंडळाने आळा घातला पाहिजे.
 
-o