"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४:
 
== बालपण व शिक्षण ==
झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानातील [[सिंध]] प्रांतातील श्रीमंत जमीनदार घराण्यातून होते. त्यांचा आयुष्याचा सुरुवातीचा काळ भारतातच गेला. भुट्टोंचे वडील तत्कालीन जुनागड संस्थानाचे नवाब होते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानाशी संधान साधले. तसे सल्ले त्यांनी नवाबाला ही दिले. याची कुणकुण लागल्यावर भारताने पोलिस कारवाईचा ताकीद दिली. जुनागडाचा नवाब पाकिस्तानात पळून गेला. पण याचा विपरीत परिणाम झुल्फिकार अली भुट्टोंच्या भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अर्जावर झाला. त्यांची भारतीय बनण्याची तीव्र इच्छा होती. पुढे १९५७ मध्ये पाकिस्तानी सरकारात परराष्ट्रमंत्री पद मिळाल्यावर त्यांनी भारताच्या सर्वोच्य न्यायालयात असणारा आपला नागरीकत्वाचा अर्ज मागे घेतला. फाळणीपुर्वीचे त्यांचे शिक्षण भारतात मुंबई येथे झाले. फाळणीनंतर ते १९४७ साली उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. पुढे १९५० साली तेथुन ते पुन्हा भारतात परतले. पण त्यांचे वडिल त्यापूर्वीच पाकिस्तान गेले होते. भारताचे नागरिकत्व ही मिळ्णे धुसर होते. अशात ते पाकिस्तानात वडिलांकडे गेले.
 
== राजकारण ==
पाकिस्तानात त्यांची ओळख राजकारणी वर्तुळाशी झाली. उच्चशिक्षित असल्याने बुध्दिवादी वर्गासोबतही त्यांची उठबस होती.
=== पंतप्रधान पद ===
इ.स. १९७१ साली [[बांगला मुक्तिसंगाम|बांगला मुक्तिसंगामात]] पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अश्या आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. इ.स. १९७४ सालातल्या भारताच्या अणुचाचण्यांनंतर त्यांनी पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामी देशांना लक्षून ''इस्लामी बाँब'' या संकल्पना मांडली. याच इस्लामी बाँबनिर्मितीसाठी त्यांनी [[लिबिया]] व [[सौदी अरेबिया]] इत्यादी देशांकडून बरेच अर्थसहाय्य मिळवले व आवश्यक तंत्रज्ञान कमवण्यासाठी विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले {{संदर्भ}}.