अशोक शंकरराव चव्हाण (जन्म २८ ऑक्टोबर १९५८) हे सध्या महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आहेतhote. २००८ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर विलासराव देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर २००८ रोजी [[अखिल भारतीय काँग्रेस पक्ष]] ने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबररोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतीक, उद्योग, खाण ह्या खात्याचे सुद्धा मंत्री आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्री [[शंकरराव चव्हाण]] यांचे पुत्र आहेत.नुकत्याच झालेल्या (महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २००९) विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा आमदार म्हणुन निवडुन आले आहेत तसेच त्यांना काँग्रेस कमिटी ने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे श्री अशोक चव्हाण हे सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत.ह्या पुर्वी कॉंग्रेस पक्षातर्फे विलासराव देशमुख ह्यांना देखील अशी संधी देण्यात आली होती.