"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Ahmad-Shah-Durani.jpeg|thumb|right|अहमदशाह अब्दाली]]
'''अहमदशाह दुराणी''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: حمد شاه درانی ;) ऊर्फ '''अहमदशाह अब्दाली''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: احمد شاه ابدالي ;) ,जन्मनावाने '''अहमदखान अब्दाली''', ([[इ.स. १७२२]] - [[इ.स. १७७३]]) हा [[दुर्राणी साम्राज्य|दुर्राणी साम्राज्याचा]] [[अफगाणिस्तान|अफगाण]] संस्थापक होता.
अहमदखान तरूणपणी अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून दाखल झाला व शौर्यामुळे लवकरच चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख बनला. [[इराण|इराणाचा]] अफशरी सम्राट [[नादिरशाह|नादिरशाह अफशर]] याचा जून [[इ.स. १७४७]] साली मृत्यू झाल्यानंतर अहमदशाह अब्दाली [[खोरासान|खोरासानाचा]] अमीर बनला. आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पठाण टोळ्यांना एकवटून त्याने पूर्वेकडे भारतीय उपखंडातल्या [[मुघल साम्राज्य|मुघल साम्राज्यास]] व पश्चिमेकडे खिळखिळ्या झालेल्या इराणातल्या अफशरी साम्राज्याला मागे रेटत आपले राज्य विस्तारले. त्याने दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, [[पाकिस्तान]], ईशान्य [[इराण]] व भारतीय उपखंडातील [[पंजाब]] प्रदेशात आपली सत्ता विस्तारली.
== युद्धमोहिमा ==
[[चित्र:Afghan royal soldiers of the Durrani Empire.jpg|thumb|right|200px|दुराणी साम्राज्यातील अफगाण सैनिक (इ.स. १८४७; चित्रकार: जेम्स रॅट्रे)]]
=== भारतीय उपखंड ===
त्याने पाच वेळा [[भारत|भारतीय उपखंडावर]] आक्रमणे केली. त्याने [[इ.स. १७६१]] साली [[पानिपतचे तिसरे युद्ध|पानिपताच्या तिसर्या युद्धात]] [[मराठा साम्राज्य|मराठ्यांना]] हरवले होते.
मराठे व अब्दाली यांच्यात इ.स. १७६१ पानिपतचे युद्ध झाले असले तरी हिंदुस्थानला अब्दालीचा हा पहिलाच परिचय होता असे नाही. या आधीही त्याने भारतावर चार स्वार्या केलेल्या होत्या.<br />
Line ९ ⟶ १६:
मुघल बादशहा अहमदशहा विरूद्ध वजीर सफदरजंग संघर्षाचा फायदा घेऊन अब्दालीने इ.स. १७५१ मध्ये तिसरी स्वारी केली. यावेळी सफदरजंग, रोहिले व पठाणांशी लढण्यात मग्न होता व त्याला मराठ्यांनी मदत केली होती. अब्दाली पंजाबला येताच घाबरलेल्या बादशहाने वजीरला बोलावणे पाठवले. सफदरजंगनेही अब्दालीविरूद्ध मराठ्यांशी करार केला व शिंदे होळकरांना बरोबर घेऊन दिल्लीकडे निघाला. परंतु तो दिल्लीला पोहोचण्याआधीच बादशहाने अब्दालीशी तह करून पंजाब देऊन टाकला होता. दिल्लीतील अंतर्गत परिस्थिती विस्फोटक बनली होती. त्यामुळे अब्दालीने दिल्लीला आपला वकिल पाठवून ५० लाख रूपये खंडणीची मागणी केली. यावेळी वजीराने काही खंडणी देऊन अब्दालीपासून दिल्लीचे रक्षण केले.
नोव्हेंबर इ.स. १७५६ मध्ये अब्दालीने चौथी स्वारी करून पंजाबमध्ये प्रवेश केला. त्याचा मुलगा तिमूरशहा व सेनापती जहानखान यांनी लाहोर जिंकून घेतल्याने संपूर्ण पंजाब अब्दालीच्या ताब्यात आला. यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून गेला, यावेळी दिल्लीचा वजीर इमाद-उल-मुल्ककडे त्याने १ कोटी रूपयांची मागणी केली त्यास वजीराने नकार दिल्याने अब्दालीने दिल्लीत प्रचंड विध्वंस व अत्याचार केले. जवळजवळ १ महिना दिल्लीची लूट केल्यानंतर तो
पानिपतच्या लढाईत मिळालेला विजय हा अब्दालीचा शेवटचा विजय ठरला. या लढाई नंतर मायदेशी जातांना तो पंजाबमध्ये गेला असता त्याला शीखांचा प्रचंड प्रतिकार सहन करावा लागला. शीखांनी अब्दालीशी इ.स. १७६७ पर्यंत संघर्ष करून पंजाब मुक्त केला. अब्दालीचे सर्व परिश्रम वाया गेले. [[इ.स. १७७३]] साली त्याचा मृत्यु झाला.
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.afghan-network.net/Culture/ahmadshah.html|इन्व्हेजन्स ऑफ अहमदशाह अब्दाली - हारून मोहसीनी यांचे संकलन|इंग्लिश}}
|