"चळवळीचे दिवस (आत्मचरित्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: चळवळीचे दिवस या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत प्रखर आंबेडक...
(काही फरक नाही)

१५:५५, ९ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती

चळवळीचे दिवस या तीस पानी आत्मचरित्रात्मक पुस्तिकेत प्रखर आंबेडकरवादी कांबळे सरांच्या बुद्धिवैभवाचा ,नेतृत्वगुणांचा प्रत्यय येतो..यांत नामांतर, मंडल आयोग, बौद्धांच्या सवलती, दलित राष्ट्रपती आदी प्रश्नांवर काम करताना त्यांनी घेतलेल्या भूमिका,वादप्रसंग ,परतवून लावलेली अरिष्टं व त्यांतून साकारणारे लढवय्या वृतीचे कांबळेसर पहावयास मिळतात. आंबेडकरी चळवळीचे बाळकडू पाजणारे त्यांचे वडील ‘आबा’; हे शंकरराव खरात,बंधूमाधव यांचे शिक्षक.उत्तम गायक असणारे,निरिश्वरवादी,आंबेडकरवादी आबा तक्क्यात(महारांची चावडी) सर्वांसमक्ष ‘प्रबुद्ध भारताचा अंक लहानग्या अरूणकडून वाचून घ्यायचे, लेखन-वाचनाचा पहिला संस्कार सरांवर झाला.सकाळी शाळा,संध्याकाळी ‘सामुदायिक शेती योजना’ राबविणार्या, ,रात्री आंबेडकरांवरील गाणी गाणार्याल आबांनी वाचनालय,बोर्डिंग़ सुरू केले. लोकसेवा वृत्तीची अशी नकळतच घडण होत होती.कविता,वक्तृत्वांत बक्षिसं मिळविणार्याल व पुढे उत्तम व्याख्यानं देणार्याा आपल्या मुलाचे जवाहरलाल नेहरू,यशवंतराव चव्हाण यांची सांगलीच्या ज्या भव्य स्टेजवर भाषणे झाली तिथे भाषण व्हावे ही इच्छा आबांची होती.ती पूर्ण झाल्यावरचा आनंद गगनात न मावणाराच होता.आंबेडकरी चळवळ घरोघरी पोहोचविण्यास वचनबद्ध असलेल्या आबांच्या बहुगुणी व्यक्तिमत्वाचा प्रभाव सरांवर होता. सरांनी ‘नामांतराचे दिवस,’ ‘जनतांदलातील दिवस’ मधून वयाच्या तेवीसाव्या वर्षी दलित पॅंथरचे अध्यक्षपद स्वीकारून आपल्या खंबीर नेतृत्वाने जे महाराष्ट्रव्यापी,देशव्यापी जनांदोलन केले त्याचा वृत्तांत येतो.त्यांनी नामांतरासाठी प्रतिकूल असणार्याख मराठवाड्यातील आमदारांसमोर कांबळेसरांनी ‘डॉ.आंबेडकर व मराठवाडा’ यांचे अतूट नाते स्पष्ट करणारे ओजस्वी भाषण केले व त्यांचे मतपरिवर्तन घडविले. नामांतरविरोधकांचे प्रतिआंदोलन,पोचीराम कांबळे,जनार्दन मेवाडे यांचे वीर मरण,दलितांवरील वाढता अत्याचार समतावादी पक्ष,संघटना यांच्या सहभागाने समतेचे,लोकशाहीचे प्रतीक बनलेले आंदोलन या घटना येथे दृश्यमान होतात. युद्धछावणीचे स्वरूप आलेले औरंगाबाद शहर,सत्याग्रहासाठी वेषांतर करून जाणे,रात्रंदिवस सभा,परिषदा,मोर्चे,जेलभरो यांमुळे अवेळी जेवणं,जागरणं,प्रकृती अस्वास्थ्य आणि यांना पुरून उरणारे जनप्रेम यांचा एक पट डोळ्यांसमोर उभा रहातो. कॉंग्रेसविषयी आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची लवचिकता कांबळेसरांमध्ये होतीच.वसंतदादा,यशवंतराव,शरद पवार यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यामुळेच ज्यांना सुरूवातीच्या काळात काळे झेंडे दाखविले त्या वसंतदादांनीच सरांनी मांडलेली आंबेडकर अकादमीची कल्पना उचलून धरली,विश्वस्त मंडळावर आले आणि ‘पैसे मागायला कोणाकडे जायचंय,चला मी तुमच्याबरोबर येतो’ असे म्हणत आपला संपूर्ण पाठिंबा जाहिर केला.पण याच मुद्द्यावर ज्यांच्यावर अतोनात प्रेम केलं,ज्यांची घडण केली त्या पॅंथरमधील सहकार्यांसनी गैरसमज बाळगून, अविश्वास दर्शवून राजीनाम्याची मागणी करावी याची बोच सरांना लागली, त्यांनी राजीनामा दिला,या सर्व घटनांची मांडणी या पुस्तिकेत आहे. पॅंथरमधून बाहेर पडल्यावर जातिव्यवस्थेचे नेमके स्वरूप कळलेल्या, अल्पसंख्यांकांबद्दल तळमळ असणार्याह वि.प्र सिंगांसह काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.जनता दलाचे आखिल भारतीय चिटणीस व राष्ट्रीय संसदीय मंडळाचे सदस्य होण्याचा मान मिळाला.सरांनी प्रा.मधू दंडवते,प्रमिला दंडवते आदिंच्या सहकार्याने धर्मांतरीत बौद्धांना अखिल भारतीय पातळीवर राखीव जागा देण्याच्या व मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याच्या आश्वासनांचा पाठपुरावा करून सत्तेत आल्यावर वर्षाच्या आत त्यांची पूर्तता करून घेतली.आपल्या आयुष्याची ही मोठी कमाई ते मानतात. ‘महाराष्ट्रटाईम्सकारांना उत्तर ,’ ‘पॅंथर नेत्यांचा भारताचे पंतप्रधान मोरारजींशी वार्तालाप’ हे लेख कांबळेसरांच्या बहुश्रुततेचा ,संदर्भसंपृक्ततेचा ,शब्दप्रभूत्वाचा,वाक्चातुर्याचा अनुभव देतात.. इंदिराजी,मोरारजी,एस.एम जोशी,वि.प्र सिंग यांच्याशी दलित हक्कांवरील चर्चा , बैठकी होत असत.रोखठोक भाषेत,बुद्धिचातुर्य बळावर आपले मुद्दे ते पटवून देत असत. सरांच्या अभ्यासू,स्वाभिमानी,नि:स्वार्थी,तत्वनिष्ठ वृत्तीचे ,लेखन वाचनाच्या व्यासंगाचे दर्शन या छोटेखानी पुस्तिकेतून घडते.