"शिवाजीराव अनंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४:
 
[[वर्ग:मराठी लेखक|भोसले, शिवाजीराव]]
समाजमन घडवण्याचा ध्यास
30 Jun 2010, 0302 hrs IST
प्रिंट मेल शेअरबुकमार्क/शेअर करा
Del.icio.us Google Bookmarks
Facebook Yahoo MyWeb
Apna Circle Reddit
और >>
सेव प्रतिक्रिया फॉन्ट:
प्रभावी वक्तृत्त्वाने आणि लेखनाने समाजमन घडवण्याचा ध्यास घेणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा जन्म साताऱ्यात
ील कलेढोण येथे १५ जुलै १९२७ रोजी झाला. त्यांचे वडील अनंतराव भोसले हे प्राथमिक शिक्षक होते. आई अनसुयाबाई अत्यंत साध्या आणि रुजू मनोवृत्तीच्या होत्या. प्राचार्यांचे मोठे भाऊ लष्करी अधिकारी, तर दोन नंबरचे बंधू प्राथमिक शिक्षक आणि त्यानंतरचे बंधू बॅ. बाबासाहेब भोसले हे माजी मुख्यमंत्री होते. विटा या लहान गावात प्राचार्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे सातारा हायस्कूल, पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, वाडिया कॉलेज आणि कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमध्ये त्यांचे माध्यमिक आणि कॉलेजचे शिक्षण झाले. राजश्री शाहू महाराजांच्या बोडिर्ंगच्या 'कमवा शिका' योजनेचा लाभही त्यांनी घेतला. कायद्याची पदवी त्यांनी आयएलएस लॉ कॉलेजातून घेतली. बंधू बाबासाहेब यांच्याबरोबर साताऱ्यात त्यांनी काही काळ वकिलीही केली.
 
फलटणच्या मुधोजी कॉलेज येथे तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकवण्यास १९५७ मध्ये त्यांनी प्रारंभ केला. अत्यंत कठीण असणारे हे विषय सहज, सोपे करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. याच कॉलेजमध्ये त्यांनी सुमारे २५ वषेर् प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
 
१९८८-९१ या काळात त्यांनी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपद सांभाळले. आपल्या कार्यकालात त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शिक्षण घेत असताना प्रा. सोनोपंत दांडेकर, डी. डी. वाडेकर, श्री. म. माटे, पु. ग. सहस्त्रबुद्धे अशा थोरांचा सहवास त्यांना लाभला.
 
आपल्या भाषणांनी अवघ्या जनतेला भारावून टाकणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावकरांची भाषणे त्यांनी अनेकदा ऐकली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांनी अखंड वाचन, चिंतन केले. कोणताही अवघड विषय आपल्या भाषणांतून सोपा करून सांगण्यात कोणीही त्यांचा हात धरू शकत नसे. त्यांनी 'आई' या विषयाची केलेली मांडणी ऐकण्यासाठी लांबून लोक येत असत. त्यांचे भाषण ऐकताना कित्येकांचे डोळे पाणवल्याशिवाय रहात नसत.
 
योगी अरविंद, स्वामी विवेकानंद, छत्रपतीबोस, समर्थ रामदास, भारतीय स्त्री जीवन, पुण्याच्या आठवणी, भारतीय तत्त्वज्ञ, तर्कशास्त्र, साहित्य हे त्यांच्या व्याख्यानांचे विषय होते. अनेक थोर पुरुषांची व्यक्तिमत्त्वे त्यांनी लोकांसमोर जीवंत केली. समाजाला नवा विचार देण्यात त्यांच्या विचारांचा फार मोठा वाटा आहे. पुणे आकाशवाणी, वसंत व्याख्यानमाला, दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व्याख्यानमाला तसेच देेशात आणि देशाबाहेरही त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली.