"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
छोNo edit summary |
||
ओळ ४१:
[[बाळाजी बाजीराव पेशवे|बाळाजी बाजीरावास]] [[विश्वासराव पेशवे|विश्वासराव]] ,[[माधवराव पेशवे|माधवराव]],व [[नारायणराव पेशवे|नारायणराव]] असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा [[पानिपत]]च्या युध्दांत पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळीं माधवरावाचें वय अवघें सोळा वर्षांचे असल्यामुळें त्याचा चुलता [[रघुनाथराव पेशवे|रघुनाथराव]] हा कारभार पाहुं लागला.वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयी होता,तरी तो बुध्दिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सुक्ष्म रीतीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुध्दि ही त्याच्या अंगी होती.
निजामाप्रमाणे [[हैदर|हैदरानेहि]] या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरावर स्वारी केली. या प्रसंगी हैदराने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून् पाहिली; पण पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून [[सावनूर]] व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
ओळ ४९:
इ.स. १७६० मध्ये [[म्हैसूर]]चा नामधारी [[राजा चिक्ककृष्णराज]] मरण पावला. त्याच्या जागी हैदराने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदराने त्यास बंदीत टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा पेशव्यांस राग येऊन, त्याने निजामांशी दोस्ती करून हैदरावर स्वारी केली. तेव्हा हैदराने मुलूख उजादड करून तलाव् फोडून व विहीरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यास २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्याने हैदरशी तह केला.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडूण राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यांत पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
ओळ ६०:
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धि. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण देवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस ह अर्धा शहाणा मानला जाई.
[[वर्ग:पेशवे]]
|