"स्वामी विवेकानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: az:Vivekananda |
No edit summary |
||
ओळ २८:
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}बंगालमध्ये कलकत्त्यातील एका उच्चभ्रू घराण्यात जन्म झाला. मात्या पित्यांचा त्यांच्या विचारसारणीवर प्रभाव पडला. वडील हे विवेकि विचारसरणीचे तर आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती. बालपणापासूनच नरेंद्राला आध्यात्मिक बाबींविषयी आणि ईश्वरच्या अस्तित्वाविषयी आकर्षण होते. ईश्वर असतो का? असतो तर कसा असतो? ईश्वराला कुणी पहिले आहे का? की ईश्वर म्हणजे केवळ अमानवी मनाचा एक भ्रामक विरंगुळा आहे? मला ईश्वर सापडेल का? कसा सापडेल? कोण मला ईश्वरच्या अस्तित्वाचा साक्षात्कार घडवून देईल? असे प्रश्न त्याला पडत. देव पाहिलेल्या माणसाचा तो शोध घेऊ लागला. ईश्वरावर दीर्घ प्रवचन देणार्याम व्यक्तींना तो प्रश्न विचारी “तुम्ही ईश्वर पहिला आहे का? अनुभवला आहे का? परंतु या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असेच मिळत असे. अशातच त्याला रामकृष्णांविषयी माहिती मिळाली. रामकृष्णांना त्याने तोच प्रश्न विचारला. उत्तर मिळाले कि होय मी देव पहिला आहे. अगदी तुला प्रत्यक्ष समोर पाहतो आहे इतक्या स्पष्टपने. त्यानंतर नरेंद्राने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. रामकृष्णांनी त्याला अद्वैत तत्वज्ञानाची शिक्षा दिली. सर्व धर्म समान आहेत आणि शेवटी त्या एकाच ईश्वरपर्यंत जातात हे ही त्यांनी विवेकानंदांना त्यांनी शिकवले. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा हे तत्व त्यांनी त्याच्या मनात बिंबवले. रामकृष्ण यांच्या मृत्यूपूर्व काही दिवस आधी त्यांनी संन्यास धर्माची दीक्षा घेतली. गुरूच्या मृत्यूनंतर त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. भारतीयांची स्थिती त्यांनी आपल्या डोळ्यांनी अनुभवली. शिकागो येथे ई. स. १८९३ साली भरणार्या जागतिक धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते शिकागोला रवाना झाले. आपल्या वक्तृत्वाने सर्व जगातील प्रतिनिधींना प्रभावीत करणार्याघ विवेकानंदांना अमेरिकेतील अनेक नामवंत संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये, आणि क्लबांमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपिय देशांमध्ये अनेक जाहिर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड मध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी ची स्थापना केली. यानंतर ते भारतात परतले. पुढे ई.स. १८९७ मध्ये त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन या आध्यात्मिक आणि सेवाव्रती संस्थेची स्थापना केली.
|