"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{बदल}}.{{संदर्भ हवा}}
{{दृष्टिकोन}}
 
ओळ २२:
 
घटनेतील कलम ३५१ अत्यंत महत्वपूर्ण आहे. यात केंद्र सरकारने राजभाषा हिंदी शब्दाचा वापर न करता हिंदी शब्दाचा वापर केला आहे. या कलमात स्पष्ट केले आहे की भारतातील एकजीव संस्कृतीच्या सर्वच अभिव्यक्तींचा माध्यम या नात्याने हिंदीचा विकास करावा. त्या भाषेचा आत्मा न बदलता या भाषेत हिंदुस्तानी (जी भाषा म.गांधी यांना अभिप्रेत होती ज्यात उर्दू व संस्कृत भाषेचा समान वापर केलेला आहे) व घटनेतील आठव्या परिच्छेदातील सर्व भारतीय भाषांच्या ( ज्या आज मितीला २२ आहेत) प्रचलित शब्दांना आत्मसात केले जावे. अन्य भारतीय भाषेचे रुप,शैली,व पदावलीचे अनुकरण करुन मुख्यत संस्कृत व अन्य सर्व भाषेचे ( यात जगातील सर्व प्रचलित भाषा ज्यात इंग्रजी सुध्दा अंतर्भुत असेल) शब्द ग्रहण करुन हिंदी भाषा समृद्ध करावी. यामुळे हे स्पष्ट होते कि भारतात हिंदी ही भाषा कोणत्याही विशेष प्रदेशाची मक्तेदारी नाही. ती जशी महाराष्ट्राची आहे तशी ती तमीळ जनतेचेची सुध्दा आहे.
स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचा उल्लेख हा तत्कालीन सर्वच राजकिय नेत्यांनी राष्ट्रभाषा हाच केला आहे{{व्यक्तिगतमत?}}. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितिची स्थापना केली गेली. आज वर्धा येथे केंद्र सरकारने जगातील पहिले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाचे स्थलातंर काही उत्तरेतील प्राध्यापक वर्ग दिल्ली करणार होते परंतु राष्ट्रभाषा प्रचार समितिच्या प्रयत्ना मुळे ते तहकुब झाले. मा.मधुकर राव चौधरी यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या भूमिवर केंद्र सरकारचा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभा राहीला आहे. त्यांनी नागपुर येथे पहिले आंतराष्ट्रीय हिंदी सम्मेलन 10 जानेवारी,1975 रोजी आयोजित केल्यामुळे आज जगात सर्वत्र व सर्व दूतावासात 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस पाळला जातो. 14 सप्टेबंर 1949 रोजी राजभाषा हिंदी स्वीकारल्या मुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात 14 सप्टेबंर हा हिंदी दिवस पाळला जातो. याचे श्रेय सुध्दा वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार समितीलाच आहे.
आज मनोरंजनाच्या क्षेत्रात हिंदीला तोड नाही. मुंबईच्या बॉलीवुड मध्ये हिंदीचे वर्चस्व आहे{{व्यक्तिगतमत?}}.गुजराती कलाकार परेश रावल,संजीव कुमार, बंगाली कलाकार शर्मिला टागोर,मिथुन चक्रवर्ती,मराठी कलाकार नाना पाटेकर, लता,आशा या विविध प्रांतातील कलाकारांनी हिंदी चित्रपटात आपला प्रभाव राष्ट्रीय स्तरावर पोहचविला आहे. राजकारण करण्याकरीता प्रांतीय अस्मिता ठीक आहे परंतु जर देशाचा विचार करणार असाल तर हिंदीला पर्याय नाही.{वैयक्तिक मत{व्यक्तिगतमत?}}. अमेरीकेवर दहशती हल्ला झाल्यानंतर राष्ट्रीय सूरक्षा योजने अंतर्गत तेथे अरबी,चीनी बरोबरच आता हिंदी करीता सुद्धा करोडों डॉलरच्या भाषा शिक्षणाच्या योजना अस्तित्वात आल्या आहेत. पुणे येथील सी-डॅक या संस्थेने जिस्ट व आर्टफेशियल इंटलिजंस अंतर्गत हिंदी व अन्य भाषा विकास योजना हाती घेतल्यामुळे देशात माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषेचा मार्ग सुकर झाला. या संस्थेने हिंदी भाषा शिकण्याकरीता लिला योजना यशस्वी केली आहे. इंग्रजी माध्यमातुन हिंदी शिकवणारे हे सॉफ्टवेयर जगात प्रसिद्ध आहे. याच संस्थेने डॉ.हेमंत दरबारी यांच्या टीमने यांत्रिक अनुवाद करणारे इंग्रजी-हिंदी सॉफ्टवेयर मंत्रा (मशीन असिस्टेड ट्रांसलेशन) हे अमेरिकन सरकारने जागतिक वारसा या अंतर्गत संग्रहित केले आहे.भारत सरकारने सर्वच भारतीय भाषेच्या विकासाकरीता मोफत सॉफ्टवेयर वितरणाचे कार्य हाती घेतले आहे. ही सेवा आयएलडीसी.इन वर उपलब्ध आहे.
हिंदी संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी उत्तर भारतात जावे लागते तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल प्रशंसा व्यक्त करतात.{{संदर्भ हवा}}. राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात.{{संदर्भ हवा}}. जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942 ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात आदराने घेतले जाते.
हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत.{वैयक्तिक मत{व्यक्तिगतमत?}}. . यात अनुवाद, पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. परंतु बेरोजगार युवकांची माथी हिंदी विरोधात पेटवून राष्ट्रीय ऐक्याला तडा जाणारी वक्तव्ये टाळावीत{{व्यक्तिगतमत?}}. पुरोगामी महाराष्ट्रात आज जर हिंदीला विरोध होणार असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव नाही. लोकशाही देशात जर नेता डोक्यांच्या संख्यने निवडला जातो तर हिंदी भाषा लोकसंख्येत सर्वांत जास्त बोलणारी व व्यवहारात आणली जाते तर ती राष्ट्रभाषा का होऊ शकणार नाही.{वैयक्तिक मत{व्यक्तिगतमत?}}. . प्रत्येक देशातील राष्ट्रभाषेला इतिहास आहे{{व्यक्तिगतमत?}}. गुलामीत राहिल्यानंतरच खुद्द इंग्लंड मध्ये इंग्रजी भाषेला १३ व्या शतकापर्यंत फ्रेंच भाषेशी संघर्ष करावा लागला{{व्यक्तिगतमत?}}. राजभाषा हिंदीचा इतिहास तर आता कोठे ६१ वर्षाचा झालेला आहे.{वैयक्तिक मत{व्यक्तिगतमत?}}. . भाषेची लढाई अनेक काळापर्यंत चालणारी आहे. भाषेचे विद्वान सांगतात की आधी मातृभाषेचा आदर करा तेव्हा कोठे तुम्ही राष्ट्रभाषेचा आदर करु शकाल.{{संदर्भ हवा}}.
 
==बाह्य दुवे==