"राष्ट्रभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १५:
 
भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और उसकी उपभाषाएं पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज इनसाइक्‍लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक तर तसेच लोकसंख्‍ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत हिंदी ही दूसरी भाषा या नात्‍यांने प्रचारात आहे. महाराष्‍ट्रात मराठी नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते
कोलकोता येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा राष्ट्रीय भाषा होऊ शकली.भारतात हिंदी ही द्वितीय किंवा तृतीय भाषेच्या स्वरुपात समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत. इंग्रजी समजणारेलिहिता फक्त 3बोलू टक्केशकणारी लोक आहेत.जनता अल्प स्वरुपात आहे.जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85 इतकी आहे.
14 सप्‍टेंबर 1949 रोजी भारताने केंद्र सरकारच्या सर्व प्रशासकिय कामकाजा करीता हिंदी भाषेचा स्‍वीकार राजभाषा या नात्याने केला आहे. घटनेतील कलम ३४३ न्वये देवनागरी लिपित लिहीली जाणारी हिंदी भाषा राजभाषा आहे. हिंदीच्या संदर्भात १९४८ रोजी चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारतीय घटना सभेत नॅशनल लैंग्वेज (राष्ट्रभाषा) व स्टेट लैंग्वेज (राजभाषा) शब्दांचा वापर केला. घटना समितीने स्टेट लैंग्वेज करीता हिंदीत राजभाषा हा अनुवाद केला आहे. यावर काही विद्वानांनी विरोध केलेला आहे.स्टेट लैंग्वेज ऐवजी ऑफिशियल लैंग्वेज हा शब्द स्वीकार केला गेला. ऑफिशियल लैंग्वेजचा प्रयोग अर्थात हिंदीचा प्रयोग सरकारी कामकाज,प्रशासन,लोकसभा व राज्यात विधान सभेत व न्याय पालिकेत स्वीकारी गेली आहे.