"केसरी (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{विकिकरण}}
ओळ ४२:
==वाटचाल==
===स्वतंत्र्य लढ्यातील योगदान===
{{विकिकरण}}
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात टिळक व गांधी या दोन्ही पर्वात आणि त्यानंतरच्या कालखंडात संयुक्त महाराष्टाच्या चळवळीत, राज्यातील जी वैचारिक वर्तमानपत्रे समाज जागृतीच्या कार्यात अग्रेसर होती, त्यात 'केसरी' वृत्तपत्रास जनमानसाने सातत्याने प्रातिनिधिकरीत्या वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिले, ही या वृत्तपत्राची खासीयत आहे. 'केसरी'ने राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे कामही केले आहे.
'केसरी'वृत्तपत्राने वर उल्लेखिल्याप्रमाणे त्या कालखंडात जे महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यास तोड नाही. 'केसरी', 'ज्ञानप्रकाश' व 'नवा काळ' ही वृत्तपत्रे साधारणतः तालुका वजा शहरात येत असत; परंतु दळणवळणांच्या सीमित सोयीमुळे त्या काळच्या मुंबई राज्यात सर्वच ठिकाणी वृत्तपत्रे उपलब्ध नसत. त्या काळात हल्ली इतके वर्तमानपत्र वाचावयास मिळणे हे सहज सुलभ नव्हते. ठराविक व्यक्तींकडेच व वर्तमानपत्रांच्या दुकानांतही मोजक्याच प्रती असत. राजकीय संक्रमणाचा कालखंड असल्यामुळे उपलब्ध वर्तमानपत्रांवर वाचकांची गर्दी होत असे.