"संयुक्त महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
[[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]] यशस्वी हो़उन संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला असला तरी [[बेळगांव]]सह ८५६ गावे व गुजरात येथील काही गावे महाराष्ट्रात येऊ शकली नाहीत. १०६ बळी घेऊन त्यावेळचे ५६ कोटी म्हणजे आताचे २१००० कोटी रूपये आणि नद्या देऊनसुध्दा संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अपूर्णच राहिले. स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकमान्य टिळक आणि गांधी प्रभृतींनी एकभाषिक राज्याची मागणी केल्यामुळे बंगाल, ओडिसा, बिहार अशी वेगळी राज्ये झाली. महाराष्ट्र राज्याच्या मागणीला मात्र वाटाण्याच्या अक्षता लावल्या. अखेरीस संयुक्त महाराष्ट्राची मागणी नेहरूंनी नाकारल्यामुळे चिंतामणराव देशमुखांसारख्या आंतरराष्ट्रीय विद्वान आणि अर्थतज्ञाने नेहरूंच्या मंत्रीमंडळातून २३ जानेवारी १९५६ रोजी अर्थमंत्रीपदाचा त्याग केला. १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईमध्ये बांधले आहे व [[बेळगावबेळगांव]] महाराष्ट्रात विलिन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
 
संकेतस्थळ:[http://samyuktamaharashtra.org/ http://samyuktamaharashtra.org/]