"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Jayesh chorge (चर्चा | योगदान) No edit summary |
Jayesh chorge (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ५०:
दिल्लीकडील राजकारण = पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावास फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावास विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडूण राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली. त्यांत पानिपत येथें मराठ्यांनी गमविलेली काही लूट होती. या वेळेच्या मराठ्यांच्या स्वारीने रोहिले लोकांस एवढी दहशत बसली की, मराठे येतात अशी नुसती हूल उठली की, रोहिले पळत सुटत.
या वेळी मराठ्यांनी दुसरेहि एक महत्त्वाचे कारस्थान तडीस नेले. त्यांत महादजी शिंदे प्रमुख होते. इ.स्. १७५४ मध्ये निजाम उल्मुल्काचा नातू गाजीउद्दीन याने वजिराचे पद् बळकावून दुसरा अलमगीर यास तत्त्कावर बसविले. त्या वेळी अलमगीरचा पुत्र मिर्झा अबदुल्ला हा दिल्लीतून पळून गेला होता. तो शहाअलम या नावाने प्रसिध्द होता. त्याने इंग्रजांचा आश्रय करुन अलाहाबादेस ठाणे दिले होते. त्याला या वेळी मराठ्यांनी दिल्लीस आणून तक्तावर बसविले.
[[वर्ग:पेशवे]]
|