"माधवराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३९:
'''श्रीमंत थोरले माधवराव पेशवे''', ([[फेब्रुवारी १६]], [[इ.स. १७४५|१७४५]] - [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १७७२|१७७२]]), हे मराठी राज्याचे पेशवे (पंतप्रधान) होते.
बाळाजी बाजीरावास विश्वासराव,माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या युध्दांत पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळीं माधवरावाचें वय अवघें सोळा वर्षांचे असल्यामुळें त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहुं लागला.वास्तविकपणे माधवराव
हा जरी अल्पवयी होता,तरी तो बुध्दिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सुक्ष्म रीतीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुध्दि ही त्याच्या अंगी होती. शत्रूचा उठाव = पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले निजामाप्रमाणे हैदरानेहि या संधीचा फायदा घेऊन दक्षिणेत मराठ्यांचा बराच मुलूख हस्तगत केला. तेव्हा इ.स. १७६४ मध्ये राघोबाशी समेट केल्यावर माधवरावाने हैदरावर स्वारी केली. या प्रसंगी हैदराने पेशव्यांचा मोड करण्याकरिता आपल्या सर्व प्रयत्नांची शिकस्त करून् पाहिली; पण पेशव्यांपुढे त्याचा टिकाव लागेना. म्हणून सावनूर व इतर बराच मुलूख, त्याचप्रमाणे लढाईचे खर्चाबद्दल म्हणून ३२ लक्ष रूपये देऊन त्याने पेशव्यांशी तह केला.
या नंतर इ.स. १७७० मध्ये पुनः हैदरावर स्वारी केली.
इ.स. १७६० मध्ये म्हैसूरचा नामधारी राजा चिक्ककृष्णराज मरण पावला. त्याच्या जागी हैदराने त्याचा वडील मुलगा नंदराज यास गादीवर बसविले. परंतु पुढे नंदराज स्वतंत्र होण्याची खटपट करीत आह, असे पाहून हैदराने त्यास बंदीत टाकले व त्याची मालमत्ता आपणाकडे घेतली. या वर्तनाचा पेशव्यांस राग येऊन, त्याने निजामांशी दोस्ती करून हैदरावर स्वारी केली. तेव्हा हैदराने मुलूख उजादड करून तलाव् फोडून व विहीरीत विष टाकून मराठ्यांस अटकाव करण्याची शिकस्त केली. परंतु मराठे पुढे येऊ लागल्यामुळे निरुपाय होऊन त्याने अप्पाजीराव नावाचा वकील तह करण्याकरिता मराठ्यांकडे पाठविला. त्याने पेशव्यास २६ लक्ष रुपये लढाईचा खर्च म्हणून् व १४ लक्ष दरसाल खंडणी म्हणून देण्याचे कबूल केल्यावरून पेशव्याने हैदरशी तह केला.
[[वर्ग:पेशवे]]
|