"मधु दंडवते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३५:
'''मधु दंडवते''' ([[जानेवारी २१]], [[इ.स. १९२४]] - [[नोव्हेंबर १२]], [[इ.स. २००५]]) हे भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते.
 
दंडवते १९७१ ते १९९० दरम्यान [[राजापूर (लोकसभा मतदारसंघ)|राजापूर मतदारसंघातून]] सलग पाच वेळा [[लोकसभा]] सदस्यपदी निवडले गेले. दंडवते [[मोरारजी देसाई]] यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसर्‍या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला. या वर्गातील शयनकक्षातील लाकडी फळकुटे बदलून त्यावर कमीतकमी दोन इंच जाडीच्या गाद्या घालण्यात आल्या. याच सुमारास त्यांनी [[कोकण रेल्वे]]च्या विकासाचे काम सुरू केले. याशिवाय [[व्ही.पी. सिंग]] यांच्या पंतप्रधानकाळात दंडवते भारताचे अर्थमंत्री होते. ते १९९०-१९९८ दरम्यान भारताच्या योजना आयोगाचे मुख्याधिकारी होते.
 
त्यांच्या पत्नी [[प्रमिला दंडवते]] भारतातील समाजवादी चळवळीतील प्रमुख नेत्या होत्या. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर [[मुंबई]]मधील [[जे.जे. हॉस्पिटल]]ला दान करण्यात आले.<ref>[http://www.hindu.com/2005/11/15/stories/2005111503871300.htm]</ref>.