"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: kn:ಪ್ರಶ್ನೋಪನಿಷತ್
No edit summary
ओळ १:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
'''प्रश्नोपनिषद्‍ ''' हे [[उपनिषद]][[अथर्ववेद|अथर्ववेदाच्या]] पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. [[पिप्पलाद|पिप्पलाद ऋषींनी]] सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.</br>
या [[उपनिषद|उपनिषदाच्या]] सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी '[[ब्रह्मन्‌ब्रह्मण‌]]' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. [[पिप्पलाद]] त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:
# [[सुकेश भारद्वाज]] - भारद्वाज कुळातील एक [[ऋषी]]
# [[सत्यकाम शैब्य]]
# [[सौर्यायणि गार्ग्य]]
ओळ १७:
'''ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः'''
 
हे देवांनो, आम्ही [[यजन]] करताना, आराधना करताना आमच्या कानांनी मंगलकारक शब्द ऐकावेत, डोळ्यांनी शुभ पहावे. सुदृढ [[अवयव]] आणि आरोग्यसंपन्न शरीरे असणारे आम्ही परमात्म्याची स्तुती करत त्याच्या ऊपयोगास येईल असे आयुष्य भोगावे. ज्याची कीर्ती सर्वत्र श्रुत आहे असा [[इंद्र]] आमचे कल्याण करो; सर्व विश्वाचे ज्ञान असणारा पूषन्‌ ([[सूर्य]]) आमचे कल्याण करो; अरिष्टांचे निराकरण करणारा '''तार्क्ष्य''' ([[गरुड वैनतेय|गरुड]]) आमचे कल्याण करो आणि [[बृहस्पती]] आमचे कल्याण करो. हे परमात्मन्‌, आमच्याकरता [[भूलोक]], [[भुवर्लोक]][[स्वर्गलोक]] या तिन्ही लोकी शांती असो.
<br><br>
 
ओळ २६:
'''वक्ष्यतीति ते ह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलादमुपसन्नाः ॥१॥'''
 
[[भारद्वाज|भारद्वाजकुलोत्पन्न]] सुकेशा, शिबिचा[[शिबि]]चा पुत्र सत्यकाम, सूर्याचा नातू [[गर्ग]] ऋषींच्या गोत्रात जन्मलेला सौर्यायणी, कोसलदेशनिवासी [[आश्वलायन]], '''विदर्भ'''देशनिवासी [[भार्गव]] आणि [[कात्यायन]] अर्थात्‌अर्थात कत्य ऋषींचा नातू कबन्धी, हे सर्व वेदपरायण आणि वेदनिष्ठ [[ब्राह्मण]] होते. स्वत: [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून घ्यावे अशी इच्छा धरून ते परब्रह्माचा शोध घेत फिरत होते. हातात [[समिधा]] घेतलेले हे सहाहीजण [[पिप्पलाद]] नावाच्या सुविख्यात ऋषींकडे आले. कारण [[परब्रह्म|परब्रह्माचे]] स्वरूप समजावून सांगण्यास [[पिप्पलाद]] ऋषी समर्थ आणि उत्सुक आहेत असे त्यांना समजले होते. ॥१॥<br><br>
 
'''तान्ह स ऋषिरुवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवत्स्यथ यथाकामं प्रश्नान्पृच्छत<br>'''
'''यदि विज्ञास्यामः सर्वं ह वो वक्ष्याम इति ॥२॥'''
 
त्यांना ते [[पिप्पलाद ऋषी]] म्हणाले "तुम्ही [[ब्रह्मचर्य]] [[व्रत]] पाळून, [[तप]] करून एक वर्षभर येथे राहा. नंतर इच्छेप्रमाणे प्रश्न विचारा. जर आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे ज्ञात असतील तर आम्ही सर्व काही समजावून सांगू." ॥२॥<br><br>
 
'''अथ कबन्धी कात्यायन उपेत्य प्रपच्छ।<br>भगवन्‌ कुतो ह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति ॥३॥'''
ओळ ४०:
'''रयिं च प्राणं चेत्येतौ मे बहुधा प्रजाः करिष्यत इति ॥४॥'''
 
यावर पिप्पलाद उत्तरले "प्रजापती परमात्म्याला [[प्रजा]] उत्पनउत्पन्न करण्याची इच्छा झाल्यावर त्याने तप करून प्रथम ''''रयि'''' आणि ''''प्राण'''' असे [[मिथुन]] ('''जोडपे''') निर्माण केले. रयि आणि प्राण यांनी मिळून सारी [[सृष्टी]] निर्माण करावी या हेतूने [[प्रजापती]] परमात्म्याने या दोघांची निर्मिती केली."<br>(जीवसृष्टीतील चैतन्य म्हणजे 'प्राण' (energy) आणि सर्व जड सृष्टी म्हणजे 'रयि' (matter) अशी संकल्पना आहे.)<br><br>
 
'''आदित्यो ह वै प्राणो रयिरेव चन्द्रमा रयिर्वा एतत्‌ सर्वं यन्मूर्तं चामूर्तं च तस्मान्मूर्तिरेव रयिः ॥५॥'''
ओळ ४९:
'''यद्दक्षिणां यत्प्रतीचीं यदुदीचीं यदधो यदूर्ध्वं यदन्तरा दिशो यत्सर्वं प्रकाशयति तेन सर्वान्‌ प्राणान्‌ रश्मिषु संनिधत्ते ॥६॥'''
 
जसा [[सूर्य]] रात्रीनंतर उगवून पूर्वेस प्रवेशतो, तसा तो पूर्वेकडिल प्राणांना आपल्या किरणांत धारण करतो. त्याप्रमाणे [[दक्षिण]] दिशेस, [[पश्चिम|पश्चिमेस]], [[उत्तर|उत्तरेस]], ऊर्ध्व दिशेस, अंतराळात तो जे जे प्रकाशित करतो ते ते तो आपल्या किरणांनी सचेतन करत असतो. म्हणजे '''सर्व दिशांना सर्वांना सूर्यच[[सूर्य]]च प्राणशक्ती देत असतो.''' ॥६॥<br><br>
 
'''स एष वैश्वानरो विश्वरूपः प्राणोऽग्निरुदयते। तदेतदृचाभ्यामभ्युक्तम्‌ ॥७॥'''
ओळ ५८:
'''सहस्ररश्मिः शतधा वर्तमानः। प्राणः प्रजानामुदयत्येष सूर्यः ॥८॥'''
 
विश्वरूप, हरि म्हणजे किरणांनी युक्त असणारा, जन्माला आलेल्या सर्वांबद्दल ज्ञान असलेला, सर्वांचा आधार, तेजरूप आणि अतिशय [[उष्ण]] असलेला, हजारो किरणांनी युक्त आणि शेकडो रुपांत वर्तमान राहणारा, उत्पन्न झालेल्या सर्व जीवांचा [[प्राण]] असणारा हा [[सूर्य]] उदय पावतो व सर्व कार्ये करतो. ॥८॥<br><br>
 
'''संवत्सरो वै प्रजापतिस्तस्यायने दक्षिणं चोत्तरं च ।<br>'''
ओळ ६५:
'''एष ह वै रयिर्य: पितृयाण: ॥९॥'''
 
[[संवत्सर]] - [[वर्ष]] हा [[प्रजापती]] होय. या संवत्सराचे [[उत्तरायण]] आणि [[दक्षिणायन]] असे दोन भाग आहेत. अनित्य हेच नित्य आहे असे मानून जे उपासक त्याप्रमाणे आचार करतात, लोकोपयोगी कामे(सार्वजनिक सुखसोयी, यज्ञादी कर्मे) करतात, ते लोक चंद्रलोकापर्यंत जाऊन तेथे जय पावतात आणि तेच पुन्हा फिरून या जगात जन्माला येतात. [[मानव]] आणि इतर प्राणिवर्गादी प्रजांचे हित इच्छिणारे [[ऋषी]] म्हणून मान्यता पावलेले हे लोक [[स्वर्ग]] अस्तित्वात असून तो यज्ञयागाने, लोकोपयोगी कर्माने मिळतो अश्या श्रद्धेने कर्म करून [[दक्षिणायन|दक्षिणायनाचा]] आश्रय घेतात. गमनागमनाच्या या मार्गाला पितृयाण असे म्हणतात. जड सृष्टीच्या परिपोष करण्याचा हा मार्गच रयि होय. ॥९॥<br><br>
 
'''अथोत्तरेण तपसा ब्रम्हचर्येण श्रद्धया विद्ययाऽऽत्मानमन्विष्यादित्यमभिजयन्ते ।<br>'''
'''एतद्वै प्राणानामायतनमेतदमृतमभयमेतत्परायणमेतस्मान्न पुनरावर्तन्त इत्यैषः निरोध: तदेषः श्लोक: ॥१०॥'''
 
[[तप]], [[ब्रम्ह्चर्य]],श्रद्धा आणि विद्या यांच्या साहाय्याने आत्मरूपाची ओळख करून घेणारे आदित्य लोकाची प्राप्ती करून घेतात. ह्याला [[उत्तरायण]] असे म्हणतात. आदित्य हा प्राणिमात्रांचे वसतिस्थान आहे. हा आदित्य [[अमृत]] प्रदान करणारा आणि सर्वाना आश्रयभूत असणारा आहे. या [[आदित्य]] लोकाची प्राप्ती झाली असता पुन्हा [[जन्म]] येत नाही असा अबाधित नियम आहे. ॥१०॥<br><br>
 
'''पञ्चपादं पितरं द्वादशाकृतिं दिव आहु: परे अर्थे पुरीषिणम् ।<br>'''
'''अथेमे अन्य उ परे विचक्षणं सप्तचक्रे षडर आहुरर्पितमिति ॥११॥'''
 
अंतरिक्षाच्या पलीकडे [[संवत्सर]] आहे. तो उदकपूर्ण असून त्याला पाच [[पाय]] आणि बारा [[अवयव]] आहेत. तो जगाचा निर्माता आहे असे ज्ञानवान लोक म्हणतात. अन्य काही काळ्वेत्ते पंडित म्हणतात की [[संवत्सर]] काल हा सर्वज्ञ असून तो सात चक्रांच्या आणि सहा अरांच्या रथामध्ये बसलेला आहे. ॥११॥<br><br>
 
'''मासो वै प्रजापतिस्तस्य कृष्णपक्ष एव रयि: शुक्ल: प्राणस्तस्मादेत ऋषय: शुक्ल इष्टं कुर्वन्तीतर इतरस्मिन्‌ ॥१२॥'''
 
[[मास]] (महिना) हा [[प्रजापती]] आहे. या मासाचा [[कृष्णपक्ष]] हा रयि आणि [[शुक्लपक्ष]] हा प्राण आहे. [[ऋषी]] शुक्लपक्षामध्ये आणि इतर लोक कृष्णपक्षामध्ये आपली इष्ट कर्तव्यें करतात. ॥१२॥<br><br>
 
'''अहोरात्रौ वै प्रजापतिस्तस्याहरेव प्राणो रात्रिरेव रयि: प्राणं वा एते प्रस्कन्दन्ति<br>'''
'''ये दिवा रत्या संयुज्यन्ते ब्रम्हचर्यमेव तद्यद्रात्रौ रत्या संयुज्यन्ते ॥१३॥'''
 
[[दिवस]] आणि [[रात्र]] मिळून होणारा दिवस हा प्रजापती आहे. त्यातील [[दिवस]] हा [[प्राण]] असून [[रात्र]] ही रयि किंवा [[अन्न]] आहे. म्हणून दिवसा जे लोक [[रतिसुख]] घेतात ते प्राणाला बाहेर टाकतात. परंतु जे कोणी [[रात्री]] उपभोग घेतात ते ब्रम्हचर्याचे पालन करतात. ॥१३॥<br><br>
 
'''अन्नं वै प्रजापतिस्ततो ह वै तद्रेतस्तस्मादिमा: प्रजायन्त इति ॥१४॥'''
 
[[अन्न]] हाच [[प्रजापती]] आहे. अन्नापासून रेताची उत्पत्ती होते आणि या [[रेत|रेतापासून]] सर्व प्रकारची प्रजा निर्माण होते. ॥१४॥<br><br>
 
'''तद्येह् वै तत्प्रजापतिव्रत् चरन्ति ते मिथुनमुत्पादयन्ते ।<br>'''
'''तेषामवैष ब्रम्हलोको येषां तपो ब्रम्हचर्य येषु सत्यं प्रतिष्ठितम् ॥१५॥'''
 
प्रजापतिव्रताचे जे लोक आचरण करतात ते मिथुनाची उत्पत्ती करतात. जे लोक [[तप]] आणि [[ब्रम्हचर्य]] यांचे पालन करतात त्यांच्या ठिकाणी सत्यता आणि एकनिष्ठपणा या गुणांची प्रतिष्ठापना होते. असे लोक ब्रम्हलोकाची प्राप्ती करून घेतात. ॥१५॥<br><br>
 
'''तेषामसौ विरजो ब्रम्हलोको न येषु जिह्ममनृंत माया चेति ॥१६॥'''
ओळ १०७:
'''भगवन्कत्येव् देवा: प्रजां विधारयन्ते कतर् एतत्प्रकाशायन्ते क: पुनरेषां वरिष्ठ् इति ॥१॥'''
 
नंतर भृगुकुलोत्पन्न वैदर्भीने पिप्पलाचार्यांना विचारले, 'आचार्य, कोणते [[देव]] प्रजेचे [[शरीर]] आहे. (प्रजा धारण करतात.) कोणते [[देव]] शरीरात्मक प्रजेला धारण करतात आणि या सर्व देवांमध्ये सर्व वरिष्ठ असा [[देव]] कोणता आहे?'<br><br>
 
'''तस्मै स होवाच ।'''
ओळ ११५:
'''ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतव्दाणमवष्टभ्य् विधारयाम्: ॥२॥'''
 
भार्गवाला [[पिप्पलाद]] म्हणाले, '[[आकाश]] हाच तो [[देव]] आहे. त्याचप्रमाणे [[वायू]], [[अग्नी]], [[आप]], [[पृथ्वी]], [[वाचा]], [[मन]], [[नेत्र]], [[कर्ण]] हे ही [[देव]] आहेत. ते या शरीराला प्रकाशित करतात (कार्यान्वित करतात) आणि अभिमानाने ते सर्व असे म्हणतात की या बाणाला (शरीराला) आम्हीच आश्रय देतो आणि धारण करतो. ॥२॥<br><br>
 
'''तान्वरिष्ठ: प्राण उवाच ।'''
ओळ १२१:
'''मा मोहमापद्यथाहमेवैतत्पञ्चधाSSत्मानं प्रविभज्यैतव्दाणमवष्टभ्य विधारयामीतिं तेSश्रद्धधाना बभूवु: ॥३।'''
 
त्यांना त्याच्यापेक्षा वरिष्ठ असा [[प्राण]] म्हणाला, 'असे मूढ होऊ नका. मीच स्वत:ला पाच प्रकारांनी विभक्त करून या शरीराला धारण करतो. पण त्याच्या या बोलण्यावर त्यांची श्रद्धा नव्हती. (ते त्यांना पटले नाही) ॥३॥<br><br>
 
'''सोSभिमानादूर्ध्वमुत्क्रामत इव तस्मिन्नुत्क्रामत्यथेतरे सर्व एवोत्क्रामन्ते तस्मिंश्च प्रतिष्ठमाने सर्व एव प्रातिष्ठन्ते ।'''
ओळ १२९:
'''एवम् वाङ्मनश्चक्षु: श्रोत्रं च ते प्रीता: प्राणं स्तुन्वन्ति ॥४॥'''
 
तो [[प्राण]] अभिमानाने शरीरातून निघून वर निघाला तोच त्याच्याबरोबर इतर सर्व इंद्रियदेवता सुद्धा निघाल्या. तो (प्राण) पुन्हा शरीरात स्थिर झाला तेव्हा सर्व जागच्या जागी स्थिर झाले. जसे मधुकररूपी राजा (फुलावरून) उडाला की (मध)माशा पण लगेच उडतात आणि तो फुलावर येऊन बसला की त्याही बसतात तसेच [[वाचा]], [[मन]], [[नेत्र]], [[कर्ण]] यांचे [[देव]] उठले आणि पुन्हा बसले. तेव्हा प्राणाचे श्रेष्ठत्व लक्षात येऊन ते सर्व देव (इंद्रिये) प्राणाची स्तुती करू लागले. ॥४॥<br><br>
 
'''एषोऽग्निस्तपत्येष सूर्य एष पर्जन्यो मघवानेष वायु:।'''
ओळ १३५:
'''एष पृथिवी रयिर्देव: सदसच्चामृतं च यत् ॥५॥'''
 
देवांनी प्राणाची स्तुती कशी केली? ते म्हणाले, 'हा प्राणच[[प्राण]]च अग्निरूपाने[[अग्नि]]रूपाने [[उष्णता]] देतो. हाच [[पाऊस]] आणि पाऊसाचा [[देव]] [[इंद्र]] आहे. वायूही[[वायू]]ही हाच आहे. हाच [[पृथ्वी]] आहे. हाच रयि आहे. जे काही आहे आणि जे काही नाही आहे ते हाच आहे. अमृतही[[अमृत]]ही हाच आहे. (अमृत याचा अर्थ [[परमात्मा]] असा येथे समजावा.) ॥५॥ <br><br>
 
'''अरा इव रथनाभौ प्राणे सर्व प्रतिष्ठितम् ।'''
ओळ १४१:
'''ऋचो यजूँषि सामानि यज्ञ: क्षत्रं ब्रम्ह च ॥६॥'''
 
रथाच्या चाकाच्या आसामध्ये जसे [[आरे]] बसविलेले असतात, त्याप्रमाणे प्राणामध्येच सर्व स्थित असते. [[ऋग्वेद]], [[सामवेद]], [[यज्ञ]], [[क्षत्रिय]] आणि [[ब्राम्हण]] (जे [[यज्ञ]] करणारे आहेत ते) हे सर्व प्राणाच्या आधारेच स्थित आहेत. ॥६॥<br><br>
 
'''प्रजापतिश्चरसि गर्भे त्वमेव प्रतिजायसे।'''
 
'''तुभ्यं [[प्राण]] प्रजास्त्विमा बलिं हरन्ति य: प्राणै: प्रतितिष्ठसि ॥७॥'''
 
हे प्राणा ! तूच [[प्रजापति]] आहेस. तूच गर्भात प्रवेश करून माता-पिता यांना अनुरूप असा [[जन्म]] घेतोस. तू जो अपानादि पाच प्राणरूपात प्रतिष्ठित आहेस, त्या तुलाच अन्नरूपाने बलि अर्पण करतात. ॥७॥<br><br>
 
'''देवानामसि वहितम: पितृणां प्रथमा स्वधा । ऋषीणां चरितं सत्यमथर्वाङ् गिरसामसि ॥८॥'''
 
हे प्राणा, देवांचे मुख जो [[अग्नि]], त्या अग्नीचे सर्वोत्तम रूप तूच आहेस. अग्नीत आहुती दिल्या की त्या देवांना मिळतात हे खरे, पण प्राणांना जे बलि म्हणून अन्न-पाणी देहामध्ये अर्पण होते ते प्राणपोषण करणारे असते आणि [[प्राण]] हाच देवांचा आधार आहे म्हणून 'वन्हितम' अशी त्याची प्रशंसा केली आहे. तू [[पितर|पितरांना]] अर्पण केली जाणारी (स्वधा) प्रथम आहुती म्हणजेच श्रेष्ठ समर्पण आहेस. अर्थात [[पितर|पितरांनाही]] प्राणशक्तीनेच पोषण मिळते. अर्थव[[अथर्व]] आणि [[अंगिरस]] यासारख्या क्रषींचे सत्य आचरण म्हणजेही तूच आहेस. ॥८॥<br><br>
 
'''इन्द्रस्त्वं प्राण तेजसा रुद्रोऽसि परिरक्षिता । त्वमन्तरिक्षे चरसि सूर्यस्त्वं ज्योतिषां पति: ॥९॥'''
 
हे प्राणा ! तू तेजाने युक्त असा [[इंद्र]] आहेस, [[रूद्र]] आहेस आणि संपूर्ण रक्षण करणारा आहेस. अंतरिक्षात वाहणारा [[वायू]] तूच आहेस आणि सर्व आकाशस्थ तेजस्वी [[ग्रह|ग्रहांचा]] मुख्य असा सूर्यही[[सूर्य]]ही तूच आहेस. ॥९॥<br><br>
 
'''यदा त्वमभिवर्षस्यथेमा: प्राणते प्रजा: । आनन्दरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति ॥१०॥'''
 
हे प्राणा, तू जेव्हा चांगला [[पाऊस]] पाडतोस तेव्हा, आता उत्तम असे अन्नधान्य मिळेल या विचाराने सर्व प्रजा (प्राणिमात्र) आनंदित होतात. (अर्थात अग्नीरूप [[प्राण]], [[इंद्र]], [[रुद्र]], [[सूर्य]] रूप प्राण, हाच मेघरूपही[[मेघ]]रूपही आहे.) ॥१०॥<br><br>
 
'''व्रात्यस्त्वं प्राणैकर्षिरत्ता विश्व्स्य सत्पति: । वयमाद्यस्य दातार: पिता त्वं मातरिश्व न: ॥११॥'''
ओळ १७५:
'''मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञां च् विधेहि न इति ॥१३॥'''
 
या जगातील सर्व काही प्राणाच्या अधीन आहे आणि स्वर्गातील जे जे काही आहे ते ही प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा, माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि राजांचे वैभव आणि ब्राम्हणांची [[प्रज्ञा]] आम्हाला दे. (ही स्तुती शरीरातील सर्व इंद्रियदेवता करीत आहेत.) ॥१३॥<br><br>
 
इति प्रश्नोपनिषदि व्दितीय: प्रश्न: ॥<br><br>
ओळ १८७:
'''कथं प्रतिष्ठते केनोत्क्रमते कथं बाह्यमभिधत्ते कथमध्यात्ममिति ॥१॥'''
 
नंतर [[पिप्पलाद]] मुनींना [[कोसल]] देशातील [[आश्वलायन]] याने विचारले - 'भगवन, हा [[प्राण]] कुठून उत्पन्न होतो? या शरीरात तो कसा येतो? स्वःताचे विभाग करून कसा राहतो? कशा प्रकारे तो निघून जातो? बाह्य जगाला कसे धारण करतो (व्यवस्थित ठेवतो)? आणि शरीरांतर्गत व्यवस्था कशा प्रकारे नीट ठेवतो? ॥१॥<br><br>
 
'''तस्मै स होवाचातिप्रश्चान् पॄच्छसि ब्रम्हिष्ठोऽसीति तस्मात्तेऽहं ब्रवीमि ॥२'''
ओळ १९३:
'''आत्मन एष प्राणो जायते । यथैषा पुरूषे छायैतस्मिन्नेतदातं मनोकृतेनायात्यस्मिञ्शरीरे ॥३॥'''
 
त्याला [[पिप्पलाद]] म्हणाले, ' तू फारच खोल प्रश्न विचारतो आहेस. पण तू ब्रह्मनिष्ठ आहेस म्हणून मी तुला सांगतो. हा [[प्राण]] [[आत्मा|आत्म्यापासून]] उत्पन्न होतो. पुरूषाची सावली जशी त्याच्यातच असते त्याचप्रमाणे हा प्राण आत्म्याच्या ठिकाणी आश्रित असतो आणि या शरीरात तो मनाने केलेल्या इच्छेने, संकल्पाने प्रवेश करतो. (अर्थात मनुष्याच्या संकल्पानुसार त्याला शरीर प्राप्त होते.) ॥२,३॥<br><br>
 
'''यथा सम्रादेवाधिकृतान् विनियुङ्त्क्ते ।'''
ओळ १९९:
'''एतन् ग्रामानोतान् ग्रामानधितिष्टस्वेत्येवमेवैष प्राण इतरान् प्राणान् पृथक पृथगेव सन्निधत्ते ॥४॥'''
 
एखादा [[सम्राट]] ज्याप्रमाने ' अमुक इतक्या गावांचा तू [[अधिकारी]], अमुक दुसर्‍या काही गावांचा हा दुसरा माणूस [[अधिकारी]] होईल' या प्रमाणे विविध अधिकार्‍यांची नियुक्ती करतो त्याप्रमाणे हा [[प्राण]], [[अपान]] आदि इतर प्राणांना वेगवेगळे काम आणि स्थान नेमून देतो. ॥४॥<br><br>
 
'''पायूपस्थेऽपानं चक्षुःश्रोत्रे मुखनासिकाभ्यां प्राणः स्वयं प्रातिष्टते मध्ये तु समानः ।'''
ओळ २०५:
'''एष ह्येतद्धुतमन्नं समं नयति तस्मादेताः सप्तार्चिषो भवन्ति ॥ ५ ॥'''
 
[[गुदद्वार]] आणि त्याजवळचे [[लिंग]] याठिकाणी तो अपानाला प्रस्थापित करतो. [[नेत्र]], [[कान]], [[मुख]] आणि [[नाक]] याठिकाणी तो प्राण स्वतः स्थित असतो आणि शरीराच्या मध्यवर्ती स्थानात तो 'समान' वायूला स्थापतो. तो समान वायूच खाल्लेले [[अन्न]] सर्वत्र समत्वाने पोहोचवतो. या प्राणामुळेच सात प्रकाशमय ज्योती उत्पन्न होतात. (२ डोळे + २ कान + २ नाकपुड्या + १ मुख) ॥५॥<br><br>
 
'''हृदि ह्येष आत्मा ।'''
ओळ २११:
'''अत्रैतदेकशतं नाडीनं तासां शतं शतमेकैकस्या द्वासप्ततिर्द्वासप्ततिः प्रतिशाखानाडीसहस्राणि भवन्त्यासु व्यानश्चरति ॥ ६ ॥'''
 
हा प्रसिद्ध [[आत्मा]] हदयस्थानी राहतो. तेथे एक शत [[नाडी|नाड्या]] आहेत. त्या एकेका नाडीला[[नाडी]]ला आणखी प्रत्येकी शंभर नाड्या निघतात आणि त्यांनाही प्रत्येकी ७२ सहस्र उपनाड्या फुटतात. या सर्व नाड्यात व्यान वायूचा संचार असतो. ॥६॥
(व्यान वायू ज्या नाड्यात संचारतो त्या [[मज्जासंस्था|मज्जासंस्थेचा]] [[ज्ञानतंतू]] आणि क्रियासंदेशवाहक तंतू (सेन्सरी नर्व्हस आणि मोटर नर्व्हस) समजाव्या तसेच सूक्ष्म शुद्ध आणि अशुद्ध [[रक्तवाहीनी|रक्तवाहीन्या]] (कँपिलरीज) त्यात येतात. इथे शत आणि सहस्र या संख्या नेमकी गणना करून नव्हे तर प्रचंड मोठी संख्या आहे असे सांगण्यासाठी योजिल्या आहेत.) <br><br>
 
'''अथैकयोर्ध्व उदानः पुण्येन पुण्यं लोकं नयति पापेन पापमुभाभ्यामेव मनुष्यलोकम् ॥ ७ ॥'''