"गोरखनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
प्रसिद्ध [[नवनाथ|नवनाथांपैकी]] एक.
'''गोरक्षनाथाची कथा.'''मछिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भीक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहुन घरातल्या स्त्री ने भीक्षा वाढतांना आपल्याला मुल व्हावे असा अशिर्वाद मागीतला.
त्यावर मछिंद्रनाथांनी स्त्री ला एक भस्माची चिमुट दिली आणि अशिर्वाद दिला, की मुलगा होईल.
स्त्री हरखून गेली व तीने शेजारी-पाजारी जावून सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकुन शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्री ने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
बारा वर्षांनी [[मछिंद्रनाथ]] परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भीक्षा देण्यास आली. तीला पाहून मछिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मुल झालेच नाही. मछिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही.
त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मछिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मछिंद्रनाथ त्या मुलाला घेवून गेले. हाच मुलगा पुढे [[गोरक्षनाथ]] म्हणून प्रसिद्धीस आला.
-------------
गोरक्षनाथांनी [[योग]] प्रकार जनमानसात रुजवला. त्यासाठी भारतभर भ्रमण केले.
यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके पुढील प्रमाणे
१. गोरक्ष संहिता
२. सिद्ध सिद्धांत पद्धती
३. योग मर्तंड
४. योग सिद्धांत पद्धती
५. योग बीज
६. योग चिंतामणी
असे म्हणतात की गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त [[नेपाळ]] व भारतावरच नाही तर [[अरब]] जगतातही होता.
कानाला भोके पाडण्याची पद्धातीही गोरक्षनाथांनी सुरु केली. अशी भोके पाडण्या आधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत.
सर्व नाथपंथीय जरी शिवा पासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, [[नाथ संप्रदाय]] [[अद्वैतवादी]] आहे.ताअणि स्व ला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे मूलतः मानणारा आहे असे समजले जाते. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच पाहिला जातो.
{{नवनाथ}}
|