"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो मार्गक्रमण साचा वाढविला
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
व्हॅलि ऑफ फ्लॉव्हर्स हे भारतातील उत्तराखंड राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. नंदादेवी राष्ट्रीय उद्याना बरोबर हे नंदादेवी रिझर्व बनवते. या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपुर्ण निसर्गामुळे याला जागतिक वारसा स्थान म्हणून मान मिळाले आहे.
 
==भौगोलिक==
 
उद्यान हे मुख्यत्वे हिमालयाच्या मध्यम ते अतिउंच रांगामध्ये आहे. एकूण क्षेत्रफळ ८७.५ चौ.किमी इतके आहे. याची मुख्य पर्वत रांग हिमालयातील झांनस्कार रांग आहे. व सर्वोच्च ठिकाण गौरी पर्वत आहे ज्याची उंची ६७१९ मी इतकी आहे. उद्यान हे वर्षातील ९ महिने जवळपास बर्फाच्छादीत असल्याने बंद असते
 
==इतिहास==
 
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक फ्रँक स्मिथ व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील कॉमेट हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले व पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांचे हरवल्याची भीती पुर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाल पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करुन त्याने व्हली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले<ref>http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html|Legend of Valley of Flowers</ref>. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची जागतिक वारसा स्थान म्हणून निवड झाली.
 
==प्राणी जीवन==
 
हे उद्यान हिमालयीन जीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. अतिशय दुर्मिळ सस्तन प्राणी व पक्षी या उद्यानात आढळतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे हिमालयीन थार , हिमबिबट्या, कस्तुरी मृग, हिमालयीन अस्वल, हिमालयीन तपकिरी अस्वल, भारल, पक्ष्यांमध्ये सोनेरी गरुड, हिमालयीन ग्रिफन गिधाड इत्यादी अतिदुर्मिळ प्राणी व पक्षी आहेत.
 
 
 
== फुले विश्व==
 
अत्यंत वैविध्यपुर्ण फुले हे येथील वैशिठ्य आहे. फुलांच्या एकुण ५०० हून अधिक जाति येथे आढळतात. त्यातील कित्येक केवळ येथेच आढळणार्‍या आहेत. फुलांमध्ये मुख्यत्वे ओर्चिड्स पॉपिस असे अनेक प्रकार येथे पहावयास मिळतात. वर्षातील नऊ महिने बर्फाच्छादित असल्याने केवळ तिनच महिने बहाराची असतात व त्यासाठी येथील फुलांनी आपापले फुलायचे दिवस ठरवून घेतले आहे असे दिसते. बहाराच्या महिन्यात दर दोन तीन आठवड्यानंतर एकाच जागी पुर्णपणे वेगळ्याच फुलांची वाढ दिसते. हा निसर्गातील परस्पर सहाय्याचा (symbiosis) चा प्रकार आहे असे तज्ञांचे मत आहे
 
 
 
 
 
 
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]