"सुधाकरराव नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९७:
| तळटीपा =
}}
'''सुधाकरराव राजूसिंग नाईक''' ([[ऑगस्ट २१]], [[इ.स. १९३४|१९३४]]; [[यवतमाळ]], - [[मे १०]], [[इ.स. २००१|२००१]]) हे [[मराठी]], भारतीय राजकारणी आणि जागतिक ख्यातीचे जलतज्ञ होते. २५ जून, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ या कालखंडात ते [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांचे ते पुतणे असून हिमाचल प्रदेशचे ते [[राज्यपाल]] सुद्धा होते. महाराष्ट्राचा 'पाणीदार नेता' , आणि 'जलक्रांतीचे जनक' म्हणून सुधाकरराव नाईक ओळखले जातात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://thevoiceofmumbai.com/2020/08/21/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0/|title=जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक|publisher=The voice of Mumbai|year=2020|location=मुंबई|accessdate=2022-04-03|archive-date=2021-10-26|archive-url=https://web.archive.org/web/20211026174756/https://thevoiceofmumbai.com/2020/08/21/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B0/|url-status=dead}}</ref> जलक्रांतीचा 'लढवय्या जलनायक' या शब्दात प्रसिद्ध साहित्यिक [[एकनाथ पवार]] यांनी सुधाकरराव नाईक यांच्या क्रांतीकारीप्रेरक कार्याचे वर्णन केले आहे.<ref>{{स्रोत बातमी|last=पवार|first=एकनाथराव|title=जलनायक सुधाकरराव नाईक|publisher=दैनिक सकाळ|year=२०२२}}</ref> "सरपंच , सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री , मुख्यमंत्री आणि राज्यपाल" हा राज्यव्यवस्था मधिल क्रमश: पहिल्या ते सर्वोच्च स्थानावर विराजमान होणारे ते एकमेव नेते आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा तसेच शेतकऱ्यांना पिक कर्जाच्या दहा टक्के व्याजदर रकमेवरून सहा टक्के व्याजदर करण्याचा क्रांतिकारी निर्णय सुधाकरराव नाईक सरकारने घेतला. अमरावती विद्यापीठ व रामटेक येथील संस्कृत विद्यापीठाची स्थापना देखील त्यांच्या कारकिर्दीत झाली. देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीचे बीजे रुजवली.महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचे शैक्षणिक शुल्क माफीचे तसेच उपस्थिती भत्ता सारखे कल्याणकारी योजना सुरू केली.
 
सुधाकरराव नाईक यांना 'जलक्रांतीचे जनक' मानले जाते. जागतिक किर्तीचे जलतज्ञ म्हणून ओळखले जाणारे जलनायक सुधाकरराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच जलसंधारण‌ चळवळीचा पाया रचला. जलसंधारण परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. "पाणी अडवा पाणी जिरवा" हा मुलमंत्र त्यांनी दिला. जलनायक सुधाकरराव नाईक यांची 'शाश्वत जलनीती' ही सन १९९२ च्या कालखंडात देशभर नावारूपाला आली. हिमाचल प्रदेशाच्या राज्यपाल पदाचा राजीनामा देत त्यांनी जलसंधारणाची चळवळ अतिशय सक्षम करून जलसाक्षरतासाठी पुढाकार घेतला.<ref>{{जर्नल स्रोत|last=पवार|first=एकनाथराव|title=जलनायक सुधाकरराव नाईक यांची शाश्वत जलनीती|journal=|pages=०४}}</ref> जलसंधारण अभियानाच्या कोकण दौऱ्यावर असतांना उष्माघातामुळे प्रकृती गंभीर झाल्याने पुढे अल्पावधीतच त्यांची प्राणज्योत मालवली. जलसंधारण क्षेत्रातील ऐतिहासिक कार्याच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री [[विलासराव देशमुख]] यांनी जलनायक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतिदिवस 'जलक्रांतीचे जनक' या नात्याने [[जलसंधारण दिन|'जलसंधारण दिन']] म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते. तेव्हापासून १० मे सर्वत्र 'जलसंधारण दिवस' म्हणून साजरा केला जातो.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://marathi.abplive.com/news/india/indian-politician-and-maharashtra-former-cm-sudhakarrao-naik-birth-anniversary-1091550/amp|title=महाराष्ट्राचा पाणीदार नेता सुधाकरराव नाईक, त्यांना'जलनायक'का म्हटल्या जाते?|last=सुर्वे|first=धनाजी|website=एबीपी माझा|url-status=live}}</ref>