"जी.एम‌.सी. बालयोगी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "जी.एम‌.सी.बालयोगी" हे पान "जी.एम‌.सी. बालयोगी" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
No edit summary
ओळ १:
'''गंटी मोहनचंद्र बालयोगी''' ([[ऑक्टोबर १]], [[इ.स. १९५१|१९५१]]-[[मार्च ३]], [[इ.स. २००२|२००२]]) हे लोकसभेचे तेरावे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर ते सार्वजनिक जीवनात पुढे आले. सर्वप्रथम ते १९९१ मध्ये [[तेलुगु देसम]] पक्षाचे उमेदवार म्हणून अमलापुरम मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.१९९६ मध्ये त्यांचा पराभव झाला.त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री म्हणून काही महिने काम बघितले.१९९८ मध्ये ते परत लोकसभेवर निवडून गेले.भारतीय जनता पक्ष आणि तेलुगु देसम पक्षांदरम्यान झालेल्या वाटाघाटींप्रमाणे त्यांचे नाव लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले.त्यांनी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लोकसभेच्या कामकाजात शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. [[एप्रिल १७]], [[इ.स. १९९९|१९९९]] रोजी [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान [[ओरीसा]]चे तत्कालीन मुख्यमंत्री [[गिरीधर गामांग]] यांना मुख्यमंत्रीपदी असतानाही लोकसभेचे सदस्य म्हणून सभागृहात मतदान करायचा अधिकार आहे का, हा प्रश्न मोठ्या कौशल्याने हाताळला.१९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेले आणि [[ऑक्टोबर २२]], [[इ.स. १९९९|१९९९]] रोजी त्यांची परत एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. [[मार्च ३]], [[इ.स. २००२|२००२]] रोजी त्यांचे पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काईकालूर या ठिकाणी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
 
{{क्रम
ओळ ८:
|पुढील=[[मनोहर जोशी]] }}
 
[[Categoryवर्ग:लोकसभेचे अध्यक्ष|बालयोगी,जी.एम‌.सी ]]
 
[[en:G. M. C. Balyogi]]