"विष्णुशास्त्री चिपळूणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
कॉमन्सवरील संदर्भसाहित्य जोडले
ओळ ३५:
 
== जीवन ==
विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील [[पूना कॉलेज]] व [[डेक्कन कॉलेज]] या महाविद्यालयांमध्ये झाले. १८७१ साली चिपळूणकरांनी पदवीचा अभ्यासक्रम पुरा केला. विष्णूशास्त्री यांनी [[इतिहास]], [[अर्थशास्त्र]], [[तर्कशास्त्र]] व नीतिशास्त्र या विषयांचा तसेच [[इंग्रजी]], [[संस्कृत]] व मराठी या भाषांतील उत्तमोत्तम ग्रंथाचा सखोल अभ्यास केला होता. बी.ए. होण्यापूर्वी विष्णूशास्त्री आपल्या वडिलांच्या ’शालापत्रक’ या मासिकाचे कामकाज पहात असत. शालापत्रकातून केलेल्या ब्रिटिश सरकारचे धोरण व ख्रिश्चन मिशनरी यांवरील टीकेमुळे, ते मासिक ब्रिटिशांनी [[इ.स. १८७५]]मध्ये बंद पाडले. पण त्यापूर्वीच विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी एकहाती मजकूर असलेले '''निबंधमाला''' हे मासिक (पहिला अंक : २५ जानेवारी १८७४) सुरू केले होते. ते सात वर्षे अखंड चालले.
 
महाविद्यालयीन शिक्षणानंतर चिपळूणकरांनी शिक्षकी पेशा निवडला. त्यांनी सन १८७२ ते १८७७ या सालांदरम्यान पुण्यातील, तर १८७८ |-१८७९]] या सालांदरम्यान त्यांनी [[रत्‍नागिरी|रत्‍नागिरीतील]] शाळांमधून अध्यापनाचे काम केले.
 
[[इ.स. १८७४|१८७४]] साली चिपळूणकरांनी ''निबंधमाला'' ह्या मासिकाचे प्रकाशन आरंभले. १८७४ सालापासून हयात असेपर्यंत, म्हणजे सुमारे आठ वर्षे, त्यांनी निबंधमाला चालवली. निबंधमालेतील निबंधांतून त्यांनी तत्कालीन [[ब्रिटिश भारत|ब्रिटिश सत्तेच्या]] अन्यायकारक धोरणांविरुद्ध टीकात्मक लिखाण, तसेच साहित्यिक लिखाणही लिहिले. त्यांनी इ.स. १८७८मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी लोकांची जाणीव वाढवण्याच्या व सामान्यजनांची काव्याभिरुची घडवण्याच्या हेतूने ''काव्येतिहास संग्रह'' हे मासिक सुरू केले. त्याच वर्षी त्यांनी पुण्यात आर्यभूषण छापखाना व चित्रशाळा स्थापण्यात पुढाकार घेतला. इ.स. १८७५मध्ये मराठी समाजाला प्रेरित करणारे साहित्य उपलब्ध करण्याच्या हेतूने चिपळूणकरांनी ''किताबखाना'' नावाचे पुस्तकांचे दुकान उघडले. उमलत्या पिढीला 'राष्ट्रीय शिक्षण' देण्याच्या उद्दिष्टातून,१८८० साली त्यांनी [[बाळ गंगाधर टिळक]] व [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्या सहकार्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.१८८१ सालच्या जानेवारीत त्यांनी ''[[केसरी (वृत्तपत्र)|केसरी]]'' हे मराठी व ''[[मराठा (वृत्तपत्र)|मराठा]]'' हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. चिपळूणकरांच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळकांनी ही दोन्ही वृत्तपत्रे पुढे चालवली. त्यांनी, आपल्या वडिलांच्या शालापत्रक या मासिकात [[कालिदास]], भवभूती, बाण, सुबंधु व [[दंडी]] या पाच संस्कृत कवींवर स्वतंत्र लेख लिहिले होते. त्या लेखांमध्ये कवींची उपलब्ध माहिती आणि त्यांच्या काव्यांचे, जरूर तेथे उताऱ्यांसहित, रसपूर्ण विवरण असे.{{संदर्भ हवा}}