एकदा चाफळला रात्री समर्थ अंथरूणातअंथरुणात पहुडले होते.त्यांचा लाडका शिष्य कल्याण त्यांचे पाय चेपत होता.रात्रीचे जवळजवळ साडे बारा वाजले होते.पाय चेपताना कल्याण स्वामीना शंका आली कि, भांडार घरात चोर शिरले असावेत.कल्याणस्वामींचे अर्धे लक्ष पाय दाबण्याकडे तर अर्धे लक्ष चोरांकडे होते.कल्याणने जेव्हा समर्थांना चोर आले असावेत असे सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले - 'अरे जाऊ दे, भांडारघरातील धान्य आपल्या एकट्याचे थोडेच आहे.त्या अन्नावर जर त्यांचे नाव लिहिले असेल तर ते त्यांना मिळेल.'कल्याणने जेव्हा भांडारघरात भिक्षेचे पैसे आहेत म्हणून सांगितले तेव्हा समर्थ म्हणाले - 'अरे जाऊदे आपण साधू आहोत. आपल्याला पैशाचा मोह काय करायचा?'समर्थ तसे पक्के व्यवहारी होते.पण मुद्दाम कल्याणाची परीक्षा पाहण्यासाठी ते तसे बोलत होते.म्हणून कल्याण म्हणाला - 'लोकांपुढे चुकीचा आदर्श ठेवल्यासारखा होईल.'आपला शिष्य वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ असलेला पाहून समर्थांना कौतुक वाटले .समर्थांनी कल्याणास त्या चोरांना भांडारघरात कोंडून ठेवायला सांगितले. कल्याण अत्यंत बलदंड होते.भलीमोठी काठी हातात घेऊन ते भांडारघरात शिरले. कल्याणांचा रुद्रावतार पाहून सारे चोर घाबरले. समर्थदेखील त्या ठिकाणी पोहोचले. <br/>
समर्थ त्या चोरांशी अत्यंत प्रेमाने बोलले. समर्थ म्हणाले, - 'तुम्हाल मी भांडारघरात काम दिले आणि पगार दिला तर तुम्ही चोरी बंद कराल का?' तेव्हा सारे चोर म्हणाले, 'कष्ट करून आमचा संसार चालणार असेल तर आम्ही या क्षणापासून चोरीचा व्यवसाय सोडून देऊ.समर्थांनी त्या सर्वांना चाफळ मठात वेगवेगळी कामे दिली.त्यामुळे त्या चोरांनी समर्थांच्या मठात नवे जीवन सुरू केले.