"अरगट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned खूणपताका: उलटविले |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
'''
या कवकामुळे कणसात व ओंबीत दाणे भरत नाहीत व त्यांच्याऐवजी लांबट, मोठी व कठीण घेवड्यासारखी वाढ होते. तिला स्क्लेरोशिया म्हणतात. वसंत ऋतूत स्क्लेरोशिया वाढून त्यापासून देठ व बीजुके तयार होतात. पक्वावस्थेतील बीजुके वाऱ्याने उडून किंवा कीटकांद्वारे जाऊन नव्या ठिकाणी (कणीस, गवत) रोग उत्पन्न करतात.
स्क्लेरोशियायुक्त कणसे खाल्ल्यामुळे मानवाला किंवा जनावरांना विषबाधा होते. या विषबाधेमुळे उद्भवणाऱ्या लक्षणसमूहाला अरगोटिझम म्हणतात. ही विषबाधा मानवाला अनेक शतकांपासून ज्ञात असून ती कधी कधी साथीचे स्वरूप धारण करते. १९५३, १९५५ व १९७३ या अगदी अलीकडील काळात अशी विषबाधा मोठ्या प्रमाणावर झाली होती. रोगग्रस्त बाजरी खाण्यात आल्याने विषबाधा होते. रोगट बाजरी मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजवत ठेविल्यास रोगट दाणे वजनाने हलके असल्यामुळे तरंगून वर येतात. ते सर्व काढून टाकून तळाची बाजरी उन्हात वाळवून वापरल्यास विषबाधा टाळता येते. पिकावरील अरगट रोग पीक आलटून पालटून घेणे, निवडक बी वापरणे तसेच कवकयुक्त गवताचा नाश करणे इ. उपायांनी टाळता येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/26869/ |title=अरगट |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= | संकेतस्थळ= मराठी विश्वकोश |अॅक्सेसदिनांक=२४ सप्टेंबर २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पिकांवरील कवकजन्य रोग]]
[[वर्ग:मराठी विश्वकोशातून कॉपीपेस्ट मजकूर]]
|