"अनंत माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो mass rollback, bot malfunctioned खूणपताका: उलटविले Reverted |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — योग्य उकार (अधिक माहिती); शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती) खूणपताका: Manual revert |
||
ओळ ४३:
==बाह्य दुवे==
तमाशापटांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असलेले, पौराणिक, ग्रामीण, संतपट, ऐतिहासिक, शाहिरांच्या जीवनावरील, सामाजिक विनोदी आणि तमाशापटांचे दिग्दर्शन करणारे अनंत माने. सांगत्ये ऐक अश्या सुंदर चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली.
कोल्हापूरच्या मराठी मातीचा गंध घेऊन अनंत माने जन्मले. त्यांचे काका ज्ञानोबा माने हे पैलवान या नावाने ओळखले जात. ते ‘प्रभात फिल्म कंपनी’त नट म्हणून काम करत. त्यांच्याबरोबर बाल अनंता
रसायन खात्यात त्यावेळी फिल्मवरील सर्व रासायनिक प्रक्रिया म्हणजे फिल्म धुणे व वाळवणे हे सारं हातानेच करावं लागे. त्याकरिता पन्नास गॅलनच्या आठ टाक्यात पाणी वाहून भरावे लागे. तसेच तापमानासाठी पहाटे शंभर पौंडी बर्फाच्या दहा लाद्या फोडून ते बर्फ टाकीतील पाण्यात टाकावे लागे. तशा पाण्यात आठ आठ तास उभे राहून फिल्म धुण्याचे काम करावे लागे. अनंता ही सारी कामे कमीपणाची न मानता मनापासून करीत असे. कारण चित्रसृष्टीने त्याला झपाटून टाकले होते.
१९३३ साली ‘प्रभात’चे कोल्हापूरहून पुण्याला स्थलांतर झाले. काकांबरोबर अनंताही पुण्याला आला. शांतारामबापूंच्या कलात्मक व तांत्रिक ज्ञानाचा अनंतावर एवढा जबरदस्त पगडा होता की त्याने त्यांना विनंती करून जिथे दिग्दर्शनाचा श्रीगणेशा गिरवता येतो त्या संकलन खात्यात बदली करून घेतली. वर्षभरात त्याने संकलनाची सारी तांत्रिक अंग आत्मसात करून शांतारामबापूचा विश्वास संपादन केला.
‘आल्हाद चित्र’च्या बाळा जो जो रेच्या वेळी माने व ग. दि. माडगूळकर यांच्यात अंगाई गीतावरून खटका उडाला. माडगूळकरांनी लिहिलेले अंगाई गीत ऐकून माने म्हणाले, ‘तुमचे गीत साहित्याच्या दृष्टीने उत्तम आहे. पण सामान्य प्रेक्षकांना ते बोजड होईल. तुमचं गीत घराघरातून प्रत्येक स्त्रीने म्हटले पाहिजे किंबहुना घरकाम
..बाळा जो जो रे
पापणीच्या पंखात झोपू दे, डोळ्यांची पाखरे..
|