"भारतीय राष्ट्रपती निवडणूक, १९५२" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन |
||
ओळ १:
{{माहितीचौकट निवडणूक
| election_name = भारतीय राष्ट्रपती निवडणूक, १९५२
Line ३५ ⟶ ३४:
|map =
}}
[[भारतीय निवडणूक आयोग|भारतीय निवडणूक आयोगा]]<nowiki/>ने 2 मे 1952 रोजी '''भारताच्या पहिल्या [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] पदाच्या निवडणुका''' घेतल्या. [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]<nowiki/>चे अधिकृत उमेदवार डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] हे 507,400 (83.81%) मतांसह या निवडणूकीत विजयी झाले. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता मात्र ४ अपक्ष उमेदवार ह्या निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार के. टी. शहा यांना 92,827 (15.3%) मते मिळाली होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://lokmat.news18.com/explainer/first-presidential-election-in-india-1952-when-rajendra-prasad-won-by-huge-margin-mh-pr-716666.html|title=राजेंद्र प्रसाद यांच्या विरुद्ध पक्ष नाही तर 4 अपक्षांनी दाखवली होती हिंमत|date=2022-06-13|website=News18 Lokmat|language=mr|access-date=2022-08-29}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/fyi/story/presidential-elections-rajendra-prasad-president-twice-congress-sarvepally-radhakrishnan-1022967-2017-07-07|title=How Rajendra Prasad became the president of India against Nehru's wish|last=DelhiJuly 7|first=india today digital New|last2=July 14|first2=2017UPDATED:|website=India Today|language=en|access-date=2022-09-01|last3=Ist|first3=2017 19:16}}</ref> डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] ह्यांनी १३ मे १९५२ रोजी भारताचे पहिले निर्वाचित राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
== पार्श्वभूमी ==
भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर [[बाबासाहेब आंबेडकर|डाॅ.आंबेडकरां]]<nowiki/>च्या नेतृत्वाखाली [[भारताची संविधान सभा|भारतीय संविधान सभे]]<nowiki/>ने देशासाठी संपूर्णपणे नवीन राज्यघटना केली आणि ती २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लागू झाली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली आणि भारत [[भारतीय प्रजासत्ताक दिन|प्रजासत्ताक]] बनला. राजा आणि गव्हर्नर जनरलची कार्यालये भारताच्या राष्ट्रपतींच्या नवीन कार्यालयाने बदलली. डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] हे १९४६ पासून संविधान सभेचे अध्यक्ष होते. घटनेच्या अस्थायी व संक्रमणी तरतुदींनुसार राष्ट्रपती पदासाठी संविधानानुसार रीतसर निवडणूक होईपर्यंत [[भारताची संविधान सभा|घटना समिती]]<nowiki/>ने तिचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत राष्ट्रपती म्हणून निवडले
१९५१-१९५२ या दरम्यान झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला 489 पैकी 364 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी काँग्रेस उमेदवार असणे ही एकमेव अट होती. या निवडणुकीनंतर नवीन प्रतिनिधी संसदेत आले आणि पहिल्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणुक घेण्यात आली.
१९५१ मध्ये राजेंद्र प्रसाद आणि [[जवाहरलाल नेहरू]] [[हिंदू कोड बिल|हिंदू कोड बिलां]]<nowiki/>बाबत एकमेकांच्या विरोधात होते. तरीपण इतर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळे राजेंद्र प्रसाद यांनाच काॅंग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. राजकीयदृष्ट्या तटस्थ व्यक्ती अध्यक्ष व्हावी, असे मानत असल्याने इतर पक्षांनी प्राध्यापक अपक्ष उमेदवार केटी शहा यांना पाठिंबा दिला.
या निवडणुकीत राजेंद्र प्रसाद यांना 507,400 मते मिळाली, तर केटी शहा यांना केवळ 92,827 मते मिळाली. या अगोदर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये सगळीकडेच काॅंग्रेसने चांगलाच विजय मिळवला असल्याने राजेंद्र प्रसाद यांचा विजय निवडणुकीआधीच निश्चित होता. त्यामुळे असे घडले की काँग्रेसच्या ६५ खासदार आणि ४७९ आमदारांनी मतदानच केले नाही. नंतर असे सांगण्यात आले की राजेंद्र प्रसाद यांचा विजय निश्चित असल्याने अनेकांनी मतदान करण्याची तसदीच घेतली नाही.
प्राध्यापक शाह हे कामगार संघटनांशी संबंधित होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केले होते. प्रोफेसर शाह 1938 मध्ये नेहरूंच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्यही होते.
== वेळापत्रक ==
Line ६८ ⟶ ७५:
== उमेदवार ==
अपक्ष उमेदवार के. टी. शाह हे अर्थशास्त्रज्ञ, वकील तसेच गुजराती नाटककारही होते. भारतीय राज्यघटना तयार होत असताना ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते. त्यांनी त्यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पूर्ण केले होते. १९१४ पासून ते मुंबईत वकिली करत होते. संविधान सभेचे सदस्य म्हणून त्यांनी भारतीय राज्यघटनेत अनेक दुरुस्त्यांचे प्रस्ताव मांडले होते, त्यातील बहुतांश फेटाळण्यात आले. परंतु, काही मंजूरही करण्यात आले. त्यांना राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द हवा होता. यासाठी त्यांनी दोनदा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी ठरला. नंतर इंदिरा गांधींनी घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला.
|