"भारतीय राष्ट्रपती निवडणूक, १९५२" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
|||
ओळ १:
{{बदल}}
== पार्श्वभूमी ==
घटनेच्या अस्थायी व संक्रमणी तरतुदींनुसार राष्ट्रपती पदासाठी संविधानानुसार रीतसर निवडणूक होईपर्यंत [[भारताची संविधान सभा|घटना समिती]]<nowiki/>ने तिचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना २४ जानेवारी १९५० रोजी झालेल्या शेवटच्या बैठकीत राष्ट्रपती म्हणून निवडले. डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] हे १९४६ पासून संविधान सभेचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना पहिले भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रस्तावित केले होते आणि वल्लभभाई पटेल यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. इतर कोणतेही नामांकन नसल्यामुळे राजेंद्र प्रसाद यांना भारताच्या राष्ट्रपती पदासाठी विधिवत निवडले गेले आहे असे असेंब्लीचे सचिव, एच.व्ही.आर. आयंगार यांनी घोषित केले. 26 जानेवारी 1950 रोजी पहिल्या [[भारतीय प्रजासत्ताक दिन|प्रजासत्ताक दिनी]], [[भारतातील गव्हर्नर-जनरलांची यादी|भारताचे गव्हर्नर-जनरल]] [[चक्रवर्ती राजगोपालाचारी]] यांनी, [[भारताचे मुख्य न्यायमूर्ती|भारताचे सरन्यायाधीश]] [[हरिलाल केन्या|हरिलाल कानिया]] यांच्या उपस्थितीत डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना भारताच्या राष्ट्रपती पदाची शपथ दिली.
== वेळापत्रक ==
Line ३२ ⟶ ३३:
== उमेदवार ==
या निवडणुकीत राजेंद्र प्रसाद हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा केलेला नाही. मात्र, 4 अपक्ष उमेदवार रिंगणात नक्कीच होते. यातील सर्वात गंभीर उमेदवार के. टी. शहा हे होते, जे स्वतः संविधान सभेत राहिले होते. भारतीय राजकारणात त्यांचे नाव होते. याशिवाय लक्ष्मण गणेश थाटे आणि चौधरी हरिराम हेही अपक्ष म्हणून रिंगणात होते. कृष्णकुमार चटर्जी हे चौथे अपक्ष उमेदवार होते.
अपक्ष उमेदवार के. टी. शाह हे अर्थशास्त्रज्ञ, वकील तसेच गुजराती नाटककारही होते. भारतीय राज्यघटना तयार होत असताना ते भारताच्या संविधान सभेचे सदस्य होते. त्यांनी त्यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पूर्ण केले होते. १९१४ पासून ते मुंबईत वकिली करत होते. संविधान सभेचे सदस्य म्हणून त्यांनी भारतीय राज्यघटनेत अनेक दुरुस्त्यांचे प्रस्ताव मांडले होते, त्यातील बहुतांश फेटाळण्यात आले. परंतु, काही मंजूरही करण्यात आले. त्यांना राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द हवा होता. यासाठी त्यांनी दोनदा प्रयत्नही केला पण तो अयशस्वी ठरला. नंतर इंदिरा गांधींनी घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला.
तिसरे उमेदवार लक्ष्मण थाटे हे हिंदू महासभेशी संबंधित होते, परंतु ह्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून लढवत होते. चौथे अपक्ष उमेदवार चौधरी हरी राम हे पुढील दोन निवडणुकांमध्येही उभे राहिले होते. दोनदा त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. ब्रिटीश राजवटीत शेतकऱ्यांना संघटित करण्याचे काम त्यांनी केले. 1923 मध्ये त्यांनी जमीनदार पक्षाची स्थापना केली होती. चौथे अपक्ष उमेदवार कृष्णकुमार चटर्जी हे कोलकाता येथील होते.
== निकाल ==
{| class="wikitable"
!अनुक्रम
!उमेदवार
!पडलेल्या मतांचे एकूण मूल्य
|-
|१
|
|
|-
|२
|कुशल तलाक्षी शाह
|92,827
|-
|३
|लक्ष्मण गणेश थाटे
|2,672
|-
|४
|चौधरी हरी राम
|1,954
|-
|५
|कृष्णकुमार चटर्जी
|533
|-
|
|'''एकूण'''
|'''605,386'''
Line ५८ ⟶ ७१:
== हे देखील पहा ==
* [[भारताचे राष्ट्रपती]]
* [[भारताच्या राष्ट्रपतींची यादी]]
*
== संदर्भ ==
|