"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: Manual revert Reverted
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
खूणपताका: Manual revert Reverted
ओळ ५७:
 
===विधानसभा निवडणूका===
कविमनाच्या ममतादीदींनी [[पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०११|२०११ विधानसभा निवडणुकीसाठीनिवडणुकिसाठी]] "मां माटी, माणूश' आणि "बदला नही बदलाव चाहिये' अशा दोन घोषणा स्वतः तयार केल्या. या घोषणांची जनमताचा ठाव घेतला. प्रत्येक सभेत त्या जणू दुर्गेचेच रूप धारण करीत. डाव्या नेत्यांवर त्या त्वेषाने तुटून पडत. एक महिला डाव्यांना आव्हान देते याचे सामान्यांना मोठे अप्रूप वाटे. केवळ त्यांना पाहण्यासाठी लोक एक-दीड किलोमीटर दुतर्फा गर्दी करीत. ज्योती बसू यांच्यानंतर सामान्यांशी त्यांच्या भाषेत संवाद साधणाऱ्या, त्यांची नस ओळखणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. 'मां, माटी, माणूश...' या घोषणेने सामान्य बंगालींना आपलसे करत ममता बॅनर्जीनी ३४ वर्षांची पश्चिम बंगालमधली कम्युनिस्टांची 'लालसत्ता' उलथून डाव्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना चारीमुंड्या चीत केले. कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकीय पटलावर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करत केंदीय मंत्रिपदापर्यंत मजल मारली. दिल्लीत जाऊनही बंगालशी असलेली नाळ त्यांनी कायम राखली. कॉटनची पांढरी सुती कमी किमतीची साडी व खांद्याला शबनम बेग लावून जनतेत मिसळणाऱ्या ममता बॅनर्जी कोलकात्याच्या कालीघाट परिसरातील पूर्वीच्याच छोट्या घरात रहातात. अशा साधेपणातून ममतांनी बंगालच्या सामान्य माणसांशी स्वतःला जोडून ठेवले.
 
[[पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, २०१६|२०१६ विधानसभा निवडणुकीमध्ये]] ममता बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने पुन्हा झंझावाती प्रदर्शन दिले व बहुमत आणि पश्चिम बंगालमधील सत्ता राखली.