"राणी लक्ष्मीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
| नाव = राणीमहाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
| चित्र = Rani_of_jhansi.jpg
| चित्र रुंदी =
ओळ ९:
| जन्मदिनांक = [[नोव्हेंबर १९]], [[इ.स. १८३५]]
| जन्मस्थान = [[वाराणसी|काशी]], [[भारत]]
| मूळगाव = [[पारोळा]],कोट [[पुणे जळगावरत्नागिरी]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[जून १८१७]], [[इ.स. १८५८]]
| मृत्युस्थान = [[ग्वालियर]], [[मध्य प्रदेश]]
| चळवळ = [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध]]
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर''', म्हणजेच ''झाशीची राणी लक्ष्मीबाई'', ([[नोव्हेंबर १९]], [[इ.स.१८३५]] - [[जून १७|जून १८]], [[इ.स. १८५८]]) या एकोणिसाव्या शतकातील [[झाशी]] राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
 
== बालपण ==
लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील [[मोरोपंत तांबे]] हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे [[सातारा]]'''रत्नागिरी''' जिल्ह्यातील धावडशी'''कोट''' गावचे होते जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी [[उत्तर प्रदेश|उत्तर प्रदेशातील]] [[काशी]] येथे झाला होता.
 
== व्यक्तिमत्त्व ==
ओळ ६५:
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला व तो अंमलात आणला. संतापलेल्या राणीची [[तलवार]] अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’
 
या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर [[ग्वाल्हेर]]ला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १८१७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणाऱ्या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणाऱ्या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा [[घोडा]] शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या [[घोडा]] ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाहीत. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.
 
== विशेष ==