"जिजाबाई शहाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — योग्य रकार (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — णार्य → णाऱ्य (अधिक माहिती)
ओळ ९३:
 
==जगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब==
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635ला [[पुणे|पुण्यात]] [[लाल महाल]] बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या, [[आदिलशाही|आदिलशाहीचा]] सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या [[दलित|दलिताचा]] मुलगा, [[रामोशी|रामोश्याचा]], [[मातंग|मातंगाचा]] आणि [[लोहार|लोहाराचा]] एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली. [[वाघोली|वाघोलीच्या]] रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता [[शिवाजी महाराज|शिवाजी]] राजा मरेल अशी भिती या भटद्वयांनी पेरली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अश्या धमक्यांना पुरुन उरणार्याउरणाऱ्या होत्या, जिजाऊंनी शिवबाला नांगर तसाच सुरू ठेवावा असे फर्मावले. [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. [[समता|समतेचे‌]], [[न्याय|न्यायाचे]], ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले. धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्यापडणाऱ्या तलवारी तयार करण्यात आल्या संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली.
 
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने [[कानंद मावळ|कानंद]], [[गुंजन मावळ|गुंजन]], [[वेळगंड]] मोसे खोऱ्यातील वीर [[बाजी पासलकर]], [[झुंजारराव मारळ]], [[तानाजी मालुसरे]] आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला [[तोरणा किल्ला|किल्ला तोरणा]] ताब्यात घेतला‌. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे [[निजामशाही|निजामशाहीचा]] किल्लेदार [[फिरंगोजी नरसाळा]] ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करून [[नरनाळा किल्ला|नरसाळा किल्ला]] मिळविला. [[चाकण|चाकणचा]] किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे [[सिंहगड|कोंढाण्याच्या]] मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. [[शहाजीराजे भोसले|शहाजीराजांची]] परंपरागत जहाँगिरी होती [[पुणे]], [[सुपे]], [[बारामती]], [[इंदापूर (पुणे)|इंदापूर]] आणि [[शिरोळ]] या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी [[पुरंदर किल्ला]] स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला [[जिंजी|जिंजीच्या]] मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने [[बाळाजी हैबतराव]] या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज [[सुभानमंगळ किल्ला]] जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करून झोपले अश्या वेळी [[मल्हार कावजी|मल्हार कावजीच्या]] नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या [[बोलसद]], [[शिरवळ]] छावणीवर हल्ले करून खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा [[सासवड|सासवडपर्यंत]] पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी [[मोगल|मोगलांचा]] दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील [[लखुजीराव जाधव|राजे लखुजीराव]], भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खून केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.