"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १९:
'''डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] चाैथे [[मुख्यमंत्री]] आणि [[भारत सरकार]]चे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात [[औरंगाबाद]] जिल्ह्यातील [[पैठण]] येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया]] (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली. पण स्वामी [[स्वामी रामानंद तीर्थ|रामानंदतीर्थ]] यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.[[यवतमाळ]] जिल्ह्यातील [[पुसद]] तालुक्यातील [[उमरखेड]] हे गाव त्यांच्या कार्याचे केंद होते. १३ सप्टेंबर १९४८ रोजी [[हैदराबाद]] संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.
 
१९४८-४९ मध्ये [[नांदेड जिल्हा]] काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२च्या१९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे [[नगराध्यक्ष]] (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. १९५६ मध्ये [[मराठवाडा]] महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून [[फेब्रुवारी]] १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
 
पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. [[कृष्णा]]-[[गोदावरी]] पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, [[पूर्णा]] आणि [[मांजरा]] या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. [[जायकवाडी धरण]] हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.