चारू मुजुमदार यांचे वडील भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. आपणही काही करावे असे वाटत असल्याने चारू यांनी १९४०च्या१९४० च्या सुमरास [[साम्यवाद|कम्युनिस्ट]] पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळत ते समाजातील वर्ग, वर्ण द्वेषांबद्दल कार्य करीत राहिले. १९६४ साली कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन झाले, चारू मार्क्सवादी पक्षात गेले. १९६७ साली काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, सगळीकडे त्यांची पीछेहाट सुरू झाली. त्यावेळी मुजुमदार यांना लोकशाही मार्गापेक्षा सशस्त्र उठावाला प्राधान्य द्यावे असे वाटू लागले. त्यांच्या या विचारांमुळे त्यांचे त्यांच्या पक्षाशी मतभेद होऊ लागले. तरीही १९६७ साली बंगालच्या सुमारे ६० खेड्यांचा समावेश असलेल्या '''नक्षलबाडी''' या भागात सशस्त्र उठाव चारू यांनी घडवून आणला आणि नक्षलबाडी क्षेत्र स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले.