"रामदासी मठ, परळी वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
||
ओळ २०:
आपणामागे भगवंतासी | भजत जावे ||
जयरामबुवा यांनी समर्थ रामदास स्वामींकडे "आपण परळी वैजनाथ येथील मठात हनुमंताची स्थापना केली, आता रामरायाची स्थापना आपल्या हस्तेच व्हावी " अशी मनीषा व्यक्त केली. समर्थांनी श्री जयराम बुवांना एक तलवार भेट दिली. आज्ञा केली की अयोध्येला जाऊन एक रामाची मूर्ती घेऊन या. मुसलमानी अत्याचार सुरूच आहेत. कुठे दगा फटका
जयरामबुवा हे अयोध्येला जाऊन मूर्ती घेऊन परळी वैजनाथला परतही आले. इकडे रामदास स्वामींचे माघ वद्य ९ शके १६०३ या दिवशी निर्वाण झाले. सर्व मठांतून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. इकडे परळी वैजनाथ मठात जयरामबुवा राम मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी वाट पहात होते. अचानक समर्थांच्या आज्ञेने कल्याणस्वामी यांचे परळी वैजनाथ येथील मठात आगमन झाले. समर्थांनी जयराम बुवांना सांगितले होते की मूर्ती स्थापनेसाठी मी कल्याणास पाठवितो. या वचनाप्रमाणें समर्थांच्या निर्वाणानंतर मठात आलेल्या कल्याण स्वामींच्या हस्ते शके १६०४मधील एका शुभदिनी परळी वैजनाथ येथील रामदासी मठात समर्थांनी स्थापन केलेल्या मारुतीरायापुढे मंत्रघोषात अयोध्येहून आणलेल्या राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली.
|