"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.९) खूणपताका: Reverted |
||
ओळ ११:
'''मराठी रंगभूमीवरील बुकिश नाटके:-'''
मराठी रंगभूमीवर बुकिश नाटकांची लाट आली तो [[काळ|कालखंड]] म्हणजे [[विष्णूदास भावे|विष्णूदास भावेंच्या]] कालखंडानंतर साधारणपणे
बुकिश नाटकापासून पडदे, [[पोशाख]], देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकिश नाटकासंबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी श्र्यू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकिश नाटकाचे प्रयोग करीत असे. [[सामाजिक समूह|सामाजिक]], [[इतिहास|ऐतिहासिक]] नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘[[थोरले माधवराव पेशवे]]’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकिश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली.
ओळ ४९:
[[विष्णूदास भावे|विष्णूदास भाव्यांनी]] ज्या काळात [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीतास्वयंवर]] हे नाटक रचले, त्या काळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचने, त्यातील कथानकांवर आधारित [[कीर्तन|कीर्तने]], [[कोकण|कोकणाकडचा]] [[दशावतारी नाटक|दशावतार]], [[कन्नड भाषा|कानडी भाषेतले]] [[यक्षगान]], भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, [[सण]], समारंभ, बारसे, [[विवाह]], अत्यंसंस्कार असे विविध विधी ह्याने सगळे सांस्कृतिक वातावरण भरलेले-भारलेले होते. काही धार्मिक प्रसंगी, विशेषतः [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. इथे कथानक आणि [[संवाद]] हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, [[वेशभूषा|वेषभूषा]], थोडे [[संगीत]], नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत [[पारायण]] – [[प्रवचन]] – कीर्तन असे विविध टप्पे दिसून येतात.
पारायणात वाचन असते, प्रवचनाच वाचनासोबत थोडे
भारत त्या काळात एक ब्रिटिश [[वसाहती साम्राज्य|वसाहत]] असल्यामुळे अनेक ब्रिटिश सैनिक अधिकारी भारतात रहात होते. त्यांच्या [[मनोरंजन|मनोरंजनासाठी]] तत्कालीन ब्रिटिश नाटक मंडळ्या भारतात येऊन प्रयोग सादर करत असत. त्यातील काही नाटके शेक्सपिअरची तर काही तत्कालीन ब्रिटिश नाटककारांची होती. त्यांची मंचनाची पद्धत मात्र शेक्सपिअर कालीन नसून त्याच काळातली असल्यामुळे ही नाटके कमानी मंचाच्या पद्धतीची होती.ह्या नाटकांचे प्रयोग होण्याकरिता ब्रिटिशांनी भारतात काही कमानी-मंच नाटकघरे उभारली. ही नाटके पहायला ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबतच प्रतिष्ठित धनिक तसेच ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्या भारतीयांना आमंत्रण असे. अशा प्रकारे त्या काळात [[युरोप|युरोपात]] ज्या पद्धतीने नाटक सादर होत असे, त्या पद्धतीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला.
|