"जॉर्ज फर्नांडिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३:
 
==सुरुवातीचे आयुष्य ==
जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म ३ जून १९३० ला१९३०ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथॉलिक ख्रिश्चन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते. सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते. त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथॉलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी, वयाच्या १९ व्या वर्षी मंगलोरमधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले. ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती.
१९४९ मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले. तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर गेले. पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले, त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला
 
==राजकीय कारकीर्द==
जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम [[इ.स. १९६७]] मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते [[स.का.पाटिल]] यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. मात्र [[इ.स. १९७१]] च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी [[इ.स. १९७४]] मध्ये नेतृत्व केले. आणीबाणीच्या कालावधीत एक आरोपी म्हणून त्यांनी तुरुंगवासही भोगला. [[इ.स. १९७७]] साली [[मोरारजी देसाई]] यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी [[उद्योगमंत्री]] म्हणून काम बघितले. जुलै १९७९ मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते [[यशवंतराव चव्हाण]] यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रीमंडळातून राजीनामा दिला.
[[इ.स. १९८४]] च्या निवडणुकीत त्यांचा [[मंगलोर]] लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला.पण [[इ.स. १९८९]] मध्ये ते [[बिहार]] राज्यातील [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले.[[विश्वनाथ प्रताप सिंह]] यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या [[संयुक्त आघाडी]] सरकारमध्ये ते [[रेल्वेमंत्री]] होते. [[इ.स. १९९१]] च्या लोकसभा निवडणुकांतही त्यांनी [[मुझफ्फरपूर]] लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला.
 
[[इ.स. १९९४]] मध्ये [[बिहार]] राज्याचे मुख्यमंत्री [[लालू प्रसाद यादव]] यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या [[नितीश कुमार]] आणि [[रवी रे]] यांच्यासारख्या नेत्यांनी [[समता पक्ष]] या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.[[इ.स. १९९६]] च्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. फर्नांडिस यांनी बिहारमधील [[नालंदा]] मतदारसंघातून विजय मिळवला.पुढे [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकींत त्यांनी [[नालंदा]] मतदारसंघातूनच विजय मिळवला. [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी [[समता पक्ष]] आणि [[रामकृष्ण हेगडे]] यांचा [[लोकशक्ती]] या पक्षांचे विलीनीकरण होऊन [[जनता दल (संयुक्त)]] हा नवा पक्ष अस्तित्वात आला.
 
[[इ.स. १९९८]] मध्ये [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी [[संरक्षणमंत्री]] म्हणून काम बघितले. [[इ.स. २००१]] मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर २००१ मंत्रिमंडळाबाहेर होते.पण ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांची परत संरक्षणमंत्रीपदी नेमणूक झाली.
 
[[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी [[बिहार]] राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या [[मुझफ्फरपूर]] मतदारसंघातून विजय मिळवला. नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रीय राहिले नाहीत.त्यांना [[इ.स. २००९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[जनता दल (संयुक्त)]] पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षनेतृत्वाबरोबरचे त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले आहेत.
 
== पुरस्कार ==
इ.स. २०२० चा२०२०चा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-2020-this-year-s-padma-awards-ceremony-was-held-at-rashtrapati-bhavan-in-delhi-dignitaries-from-various-fields-were-honored-with-padma-awards-1011712 |title=Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव |दिनांक=८ नोव्हेंबर २०२१ | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=८ नोव्हेंबर २०२१ |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20211108171440/https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-2020-this-year-s-padma-awards-ceremony-was-held-at-rashtrapati-bhavan-in-delhi-dignitaries-from-various-fields-were-honored-with-padma-awards-1011712 |विदा दिनांक=८ नोव्हेंबर २०२१ }}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}