"चक्रधरस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ १५:
 
==एकाकी भटकंतीचा काळ==
[[गोविंदप्रभू|गोविंदप्रभूंपासून]] शक्ती मिळाल्यानंतर चक्रधरांची विरक्ती अधिकच वाढू लागली. [[लीळाचरित्र]]ाच्या एकांक या भागात त्यांच्या या काळातील भ्रमंतीचे वर्णन आहे. अहमदनगर जिल्यातील पाथर्डी पासुन आठरा कि.मी. अंतरावर येळी या गावी "लीळाचरित्र" या मराठी भाषेतील पहिल्या चरित्र ग्रंथात काही काळ चक्रधरस्वामी येळी या ठिकाणी वास्तव्यास आल्याचा उल्लेख "लीळाचरित्र" या ग्रंथात करण्यात आला आहे, येळी या ठिकाणी नदी किणारी महानुभाव पंथीय मंदीर आहे.या काळात त्यांनी महाराष्ट्रभर एकट्यानेच भटकंती केली. [[आंध्र प्रदेश]]ाच्या काही भागातही त्यांनी भ्रमण केले.<ref>[[लीळाचरित्र]], एकांक, लीळा ११ आणि १४</ref> यावेळेपर्यंत चक्रधरांना फारसा शिष्यपरिवार लाभला नव्हता. त्याकाळात चक्रधरांचे वर्तन काहीसे अवलियाप्रमाणे दिसून येते. एका प्रसंगी तर ते गाईच्या गोठ्यात जाऊन झोपले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा ११</ref> एका प्रसंगी [[वरंगळ]] येथील एका घोड्याच्या व्यापाऱ्याने आपल्या हंसांबा नामक मुलीचे चक्रधरांसोबत लग्नही लावून दिले. तिथे काही दिवस राहून ते परत संन्यस्त झाले.<ref>लीळाचरित्र, एकांक, लीळा १६</ref> गोंडवनातील आदिवासींच्या सहवासातही ते काही दिवस राहिले. या काळात चक्रधरांना तुरळक शिष्य लाभले, त्यांपैकी [[वडनेर]]चे रामदेव दादोस हे प्रमुख होते. त्यांच्यामार्फतच पुढे चक्रधरांना नागदेव, आबाइसा, महादाइसा, उमाइसा इत्यादि इत्यादी शिष्यपरिवार मिळाला.
 
या भ्रमंतीच्या काळात चक्रधर यांची [[मेहकर]] येथे बाणेश्वराच्या मंदिरात बोणेबाईंची भेट झाली. बोणेबाईंना [[देवकी]] व स्वतः [[श्रीकृष्ण]] बनवून त्यांनी [[मेहकर]] येथे [[गोकुळाष्टमी]] साजरी केली. बोणेबाईंबरोबर त्यांनी [[लोणार]]ची यात्राही केली. नंतर एके दिवशी [[सिंहस्थ]] यात्रेच्या निमित्ताने ते बोणेबाईंबरोबर [[त्र्यंबकेश्वर]]ला जाण्यास निघाले. वाटेत [[पैठण]] येथे त्यांनी [[त्र्यंबकेश्वर]]ास जाण्याचा बेत रद्द करून [[पैठण]] येथेच विधिवत संन्यासाची दीक्षा घेतली. ही घटना शके ११८९ मध्ये घडली.<ref name="sankpal27">संकपाळ (२००९) पृ. २६-२७</ref> अशा तऱ्हेने [[रिद्धपूर|ऋद्धिपुरापासून]] सुरू झालेले चक्रधरांचे एकाकी भ्रमण [[पैठण]] येथे संपले. यानंतरच्या काळात त्यांनी प्रकटपणे समाज व धर्मसुधारणेचे त्यांचे कार्य सुरू केले.