"ऑपरेशन ब्लू स्टार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
||
ओळ १:
{{विस्तार}}'''ऑपरेशन ब्लू स्टार''' ( ਬਿਲਯੂ ਸਟਾਰ ) हे ३ ते ६ जून १९८४ दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे.<ref>[http://www.rediff.com/news/2004/jun/03spec.htm Operation BlueStar, 20 Years On]</ref> अमृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला.<ref>[http://www.bharat-rakshak.com/LAND-FORCES/Army/History/1970s/Bluestar.html Operation Bluestar, [[5 June]] [[1984]]]{{मृत दुवा}} [http://wayback.archive.org/web/20080316164707/http://www.bharat-rakshak.com/LAND-FORCES/Army/History/1970s/Bluestar.html विदागारातील आवृत्ती]</ref> तत्कालिन पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्यावसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले. अखेरीस ऑपरेशन ब्लू
==पंजाबातील घडामोडी==
१९६६ मध्ये शीख बहुल असणारा पंजाब राज्य रचना झाली. पण त्यानंतरही पंजाबच्या राजकारणात पकड कायम ठेवण्यासाठी [[अकाली]] दलाकडुन आक्रमक राजकारण चालु राहिले. चंडिगड पंजाब मधील सामिल करावे. पंजाबमधुन जाणाऱ्या नद्यांवरील पाणी हरियाणा व
१९७३ मध्ये आनंदपुर साहिब मध्ये एक ठराव पास करण्यात आला. याठरावानुसार केंद्र सरकारने केवळ विदेश, संरक्षण व मुद्रा अशी पाच खाती सांभाळावीत आणि इतर अधिकार पंजाबला देत स्वायत्तता द्यावी अशी मागणी करण्यात आली.मार्च १९८१ मध्ये स्वायत्त खलिस्तानचा झेंडा आनंदपुर साहिब वर फडकवण्यात आला. दरम्यान जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांनी जहाल भाषणे देण्यास सुरुवात केली.दमदमी टकसालच्या प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली. जहालमतवादी लोकांचा त्यांना पाठिंबा मिळु लागला व आपल्या मागण्यांसाठी सशस्त्र मार्ग त्यांनी निवडला. दमदमी टकसाल आणि निरंकारी पंथाचे शीख यांत एप्रिल १९७७ मध्ये संघर्ष झाला यात १३ शीख मारले गेले. पुढे २४ एप्रिल
यानंतर पंजाबातील परिस्थिती आणखी बिघडली.
*
*२३ एप्रिल
*जुन ते ऑगस्ट दरम्यान अकाली दलातर्फे मोठ्या प्रमा़णात रेल रोको व बंद करण्यात आले.
*५ ऑक्टोंबरला रात्री एका बस मधुन उतरवुन ६ हिंदु प्रवाशांना गोळी घालुन मारण्यात आले. अखेर ऑक्टोंबर १९८३ साली कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून पंजाबमधील कांग्रेसशासित राज्यसरकारच्या बरखास्तीची केंद्र सरकारने घोषणा करून राज्यात राष्ट्रपती शासन लागू केले.
*डिसेंबर १९८३ मध्ये जर्नेल सिंह यांनी सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त साहिब मध्ये आश्रय घेतला.
*फेब्रुवारी
*एप्रिल
*मे
*याच दरम्यान अकाली दल व केंद्र सरकार यांत चाललेल्या वाटाघाटी विफल झाल्याचे अकाली दलाने घोषित केले.
*अखेर जुन महिन्यात केंद्र सरकारने ऑपरेशन ब्ल्युस्टारचा निर्णय घेतला.
ओळ २०:
==ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई==
[[File:Akal takhat amritsar.jpg|thumb|right|अकाल तख्त यातच जर्नेल सिंह व शाबेग सिंह सह प्रमुख दहशवादी तळ ठोकुन होते.]]
ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात होते. त्यांचे सशस्त्र समर्थक व दहशतवादी दलांचे नेतृत्व शाबेग सिंह यांच्याकडे होते. (शाबेग सिंह हे पुर्वी भारतीय सैन्यात मेजर जनरल पदावर होते,
आपल्या ऑपरेशन ब्लू स्टार: अ ट्रु स्टोरी या पुस्तकात मेजर जनरल बरार म्हणतात. ३० मे रोजी मेरठ मधुन त्यांना तातडीने चंदिगढ येथे पोहचण्याचा संदेश मिळाला. तेथेच त्यांना संभाव्य कारवाईचे आदेश व नेतृत्व देण्यात आले. पुढे सांगण्यात आले, परिस्थिती फार बिघडली असुन येत्या २/४ दिवसात खलिस्तानची घोषणा होऊ शकते. यानंतर पंजाब पोलिस दल खलिस्तानच्या स्वाधीन होईल. यानंतर दिल्ली व हरियाणातील शीख पंजाब कडे कूच करून, हिंदुं पंजाबातुन बाहेर येतील. १९४७ प्रमाणे दंगली उसळन्याची शक्यता आहे. याचवेळी पाकिस्तानही सीमा पार करून समर्थन देऊ शकतो व बांगलादेश निर्मिती सारखा प्रकार भारतातही घडवला जाऊ शकेल.
ओळ २८:
कारवाईची सुरुवात रात्री ७ वाजेच्या सुमारास करण्याची योजना होती. त्यामुळे ५ वाजता भारतीय सेनेने लाउडस्पीकर वरून सुचना देऊन ज्यांना बाहेर पडायचे असेल त्यांना बाहेर येण्यास सुचवले. पण कोणीही बाहेर आले नाही. पुन्हा रात्री ७ वाजता तशाच सुचना देण्यात आल्या पण प्रतिसाद मिळाला नाही अखेर रात्री ९ वाजता पुन्हा सुचना दिल्यानंतर ८ ते १० वृद्ध माणसे बाहेर आली. जनरल बरार यांच्या म्हणण्यानुसार या माणसांनी सांगितले की आत मधुन इतर जणांनाही बाहेर यायचे आहे पण त्यांना येऊ दिले जात नाही. अखेर सैन्याने कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सैन्याची सुरुवातीची योजना होती की दहशतवाद्यांचे बाहेरील कडे नष्ट झाल्यावर जर्नेल सिंह सकट इतर दहशतवाद्यांना समर्पण करायला लावायचे. पण प्रत्यक्ष सुवर्ण मंदिरात दडलेल्या दहशतवाद्यांच्या तयारीची व शस्त्र सामग्रीची सैन्याला कल्पना नव्हती.
यानंतर १० व्या बटालियनचे जवान त्यांच्या मदतीला देऊन पुन्हा हल्ला करण्यात आला. यावेळी जवानांनी पायऱ्यांजवळीन मशिन गन्स निकामी करण्यात यश मिळवले. यानंतर जवानांनी "परिक्रमा" भागात प्रवेश केला. पण आतील बाजुत दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार व ग्रेनेडचा हल्ला केला यामुळे जवानांना अकाल तख्त पर्यंत पोहोचता आले नाही. दहशतवाद्यांनी दरवाजे आणि खिडक्यांवर वाळुने भरलेली पोती लावली होती. यामुळे त्यांच्या वर सरळ गोळीबार करता येत नव्हता त्यातच अश्रुधुराप्रमाणे काम करणारे सन ग्रेनेड भारतीय सैनिकांनी फेकल्यावर ते उलटुन परत येत होते. सैनिकांनी यानंतर सुवर्ण मंदिराच्या दिशेने फार मारा होत असुन प्रत्युतरासाठी सुवर्ण मंदिराच्या दिशेने गोळीबार करण्याची परवानगी मागितली. पण सुवर्ण मंदिराच्या वास्तुला कसलेही नुकसान न करण्याचे निर्देश असल्याने जनरल बरार यांनी गोळीबाराची परवानगी दिली नाही. तेव्हा सैन्याच्या प्राणहानीच्या बातम्या सतत येत राहिल्या. सैनिक अकाल तख्तच्या जवळही जाऊ शकत नाहीत आणि प्राणहानीचा आकडाही वाढत होता तेव्हा एका चिलखती गाडी तुन जवानांना अकाल तख्तजवळ जाण्यासाठी पाठवन्यात आले. पण दहशतवाद्यांनी रॉकेट लॉंचरने ती चिलखती गाडी उडवली. यानंतर जनरल बरार यांनी वरिष्ठांकडे रणगाड्यांचा वापर करण्याची परवानगी मागितली व ती मिळाली. प्रथम रणगाड्यांच्या हॅलोजन दिव्यांच्या प्रकाशाने दहशतवाद्यांवर प्रखर प्रकाशझोत मारुन हल्ला करायचा प्रयत्न झाला पण तोही यशस्वी झाला नाही. अखेर रणगाड्यांतुन अकाल तख्त वर मारा करन्यात आला जो यशस्वी ठरला. यानंतर रात्री १ वाजेच्या (६ जुनच्या सकाळी) सुमारास काही जण पांढरे निशाण फडकवुन बाहेर आले तेव्हा सैन्याला कारवाई यशस्वी झाल्याचा अंदाज आला. नंतर अकाल तख्तमध्ये घुसुन जर्नेल सिंह व शाबेग सिंह यांची प्रेते मिळाली व त्यांची ओळख पटवण्यात आली. आजुबाजुच्या परिसरातील सर्व दहशतवाद्यांना ताब्यात घेण्याची कारवाई आणखी काही तास सुरू राहिली.
ओळ ४२:
बीबीसी वृतवाहिनीला रामगढ येथील विद्रोहात सहभाग घेतलेले सैनिक बलजीत सिंह यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
"मी शीख रेजिमेंटल सेंटर रांची मध्ये होतो. १०
==संदर्भ आणि नोंदी==
|