"एकच प्याला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १:
'''एकच प्याला''' हे [[राम गणेश गडकरी]] यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठीतील]] नाटक आहे. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक गडकऱ्यांनी इ.स. १९१७ सालच्या सुमारास लिहिले. गंधर्व नाटक मंडळीने याचा पहिला प्रयोग २० फेब्रुवारी, इ.स. १९१९ रोजी [[वडोदरा|बडोद्यात]], तर बलवंत संगीत मंडळीने याचा पहिला प्रयोग ६ फेब्रुवारी, इ.स. १९२० रोजी [[सोलापूर|सोलापुरात]] केला <ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=49774:2010-02-21-19-29-51&catid=47:2009-07-15-04-02-02&Itemid=58 | title = 'स्मरण राम गणेशांचे' | लेखक = श्रीराम रानडे | प्रकाशक = लोकसत्ता | दिनांक = २१ जानेवारी, इ.स. २०१० | भाषा = मराठी}}</ref>. गडकऱ्यांनी आपले ‘एकच प्याला’ हे तिसरे नाटक १९१७ च्या१९१७च्या नोव्हेंबरमध्ये लिहून पुरे केले; तथापि ते नाटक ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या रंगभूमीवर गडकऱ्यांच्या मृत्यूनंतर दहा-अकरा महिन्यांनी आले. त्यात वि. सी. गुर्जरांनी नंतर पदं लिहिली. या नाटकातली सिंधू बालगंधर्व साकारणार होते, त्यामुळे आणि तेव्हाच्या रिवाजानुसार नाटक संगीत होणार होते, यात वादच नव्हता. उलट गडकऱ्यांनी नारायणराव राजहंसांना, तुम्हाला फाटके लुगडे नेसायला लावीन, असे सांगूनच ठेेवले होते असे म्हणतात; ह्या नाटकाचे कथानक ऐकूनच बालगंधर्वांनी अशा भूमिकेसाठी गोणपाट घालूनही काम करायची माझी तयारी आहे, असे त्यांना उत्तर दिले होते.
 
दारूच्या व्यसनामुळे सुधाकरसारखा एक बुद्धिमान, तेजस्वी आणि स्वाभिमानी माणूस स्वतःचा, आपल्या साध्वी पत्नीचा आणि आपल्या संसाराचा कसा नाश करून घेतो, ही भयानक गोष्ट गडकऱ्यांनी प्रभावी भाषेतून नि रोमांचकारी घटनांमधून प्रेक्षकांना परिणामकारक रीतीने सांगितलेली आहे. मद्यपानाच्या व्यसनाची अत्यंत मूलभूत आणि शास्त्रीय मीमांसा गडकऱ्यांनी लालित्यपूर्ण आणि नाटय़पूर्ण भाषेत या नाटकात केली आहे.<ref name="loks_‘एकचच">{{Cite websantosh | title = ‘एकच प्याला’ ही ट्रॅजेडी आहे काय? | अनुवादित title = | लेखक = लोकसत्ता टीम | काम = लोकसत्ता | दिनांक = 4 मार्च 2018 | ॲक्सेसदिनांक = 14-03-2018 | दुवा = https://www.loksatta.com/lekha-news/ekach-pyala-marathi-sangeet-natak-pralhad-keshav-atre-1639520/ | भाषा = Marathi | अवतरण = दारूचे व्यसन मनुष्याला एकदा लागले, की त्याच्यापायी त्याचा नि त्याच्या संसाराचा केवढा भयंकर विध्वंस होतो, एवढे एकच चित्र गडकऱ्यांना जास्तीत जास्त भयानक, विदारक आणि थरारकरीतीने या नाटकात चितारावयाचे होते. }}</ref>