"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १३:
मराठी रंगभूमीवर बुकिश नाटकांची लाट आली तो [[काळ|कालखंड]] म्हणजे [[विष्णूदास भावे|विष्णूदास भावेंच्या]] कालखंडानंतर साधारणपणे १८६१ च्या दरम्यान [[विद्यापीठ|विश्वविद्यालयाची]] स्थापना होऊन [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[इंग्रजी]] [[शिक्षण]] सुरू झाल्यावर त्या शिक्षणाने जे काही परिणाम झाले त्यातील एक म्हणजे लोकांची बुकिश नाटकाकडील प्रवृत्ती वाढली. [[महाविद्यालय|महाविद्यालयामध्ये]] [[विल्यम शेक्सपिअर|शेक्सपिअर]], [[कालिदास]] यांच्या नाटकाचा रसास्वाद जेव्हा उमजू लागला तस तसे इंग्रजी, [[संस्कृत]] नाटकाचे प्रयोग होऊ लागले. संस्कृत नाटकांची, इंग्रजी भाषेतील नाटकांची भाषांतरे होऊन [[पाश्चिमात्यीकरण|पाश्चिमात्य]] रीतीरिवाज, आचारविचार यांच्याकडे मराठी रंगभूमीचा ओढा वाढला. विद्वान मंडळींनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची भाषांतरे किंवा रुपांतरे केली त्याचबरोबर स्वतंत्र नाटके मराठीत रचून नाटक मंडळींना शिकवली याचा मराठी रंगभूमीला उपयोग झाला व सुधारणा झाली. बुकिश नाटकांकडे कल वाढविण्यास प्रामुख्याने ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ कारणीभूत आहे. ‘वेणीसंहार’, ‘ऑथेल्लो’, ‘तारा’, ‘किंगलियर’, शंकरराव पाटकर हे नट ‘ऑथेल्लो’ नाटकातील ‘यागोची’ व्यक्तिरेखा खूप कमालीची करीत.
बुकिश नाटकापासून पडदे, [[पोशाख]], देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकिश नाटकासंबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी श्र्यू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकिश नाटकाचे प्रयोग करीत असे. [[सामाजिक समूह|सामाजिक]], [[इतिहास|ऐतिहासिक]] नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरूवातसुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘[[थोरले माधवराव पेशवे]]’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकिश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली.
(संदर्भ: भरत नाटय संशोधन मंदिर)
 
ओळ २३:
मराठीत ‘बुवा तेथे बाया’ लोकप्रिय झाले, तर मोलिअर यांच्या नाटकाला तेथे प्रचंड विरोध झाला व तो धर्मगुरूंकडून. तितकेच नव्हे, तर मोलिअर यांच्या नाटकांपैकी सर्वात जास्त वादळ उठले ते त्या नाटकामुळे. त्यामुळे त्या नाटकाचे प्रयोग पहिली तीन वर्षें तुरळक होत असत. मॉलिअर यांनी संहितेत फेरफार [[इ.स. १६६७]] मध्ये केले - मूळ तीन अंकी असलेले नाटक पाच अंकी केले. कर्वे यांनी रूपांतर केले ते त्या दुसऱ्या संहितेचे असावे असे इंग्रजी संहिता वाचल्यावर दिसते. नाटककाराने त्याच्या प्रस्तावनेत त्यासंबंधी काही तपशील दिलेले नाहीत.
नाटकात केंद्रीय भूमिकेत एक गुरू आहे. एका सुखवस्तू जमीनदाराने त्याला त्याच्या घरी आणून बसवले आहे. जमीनदाराला सुस्वरूप अशी दुसरेपणावर आलेली बायको आणि पहिल्या बायकोची दोन मुले आहेत. जमीनदाराने त्यांपैकी त्याच्या मुलीचे लग्न तिच्या प्रियकराशी लावून देण्याचे वचन दिले होते, परंतु तो गुरूच्या नादी लागल्यावर त्याने त्याचे वचन बदलून तिचे लग्न गुरूशी लावून देण्याचा निर्णय जाहीर केला. मुलगी त्यासाठी अर्थातच तयार होत नाही, परंतु त्याच वेळी तिच्यात वडिलांच्या विरोधात जाण्याचे बळही नसते. पण घरची मोलकरीण जमीनदाराची कानउघाडणी करते, इतरही लोक तसा प्रयत्न करतात, पण व्यर्थ. गुरू जमीनदाराच्या पत्नीवरच नजर ठेऊनठेवून असतो. पत्नी त्याचा पर्दाफाश करते. जमीनदाराला त्याची चूक कळते, पण त्यासाठी फार उशीर झालेला असतो. कारण पर्दाफाश होण्यापूर्वीच, जमीनदाराने त्याची सर्व संपत्ती - घरासकट गुरूच्या नावे केलेली असते. गुरू जमीनदाराला घराबाहेर काढण्यासाठी बेलीफ आणतो. जमीनदाराने गुरूच्या हाती विश्वासाने एक कागद सोपवलेला असतो त्यावरून जमीनदाराचे संबंध बंडखोरांशी आहेत असे राजाला वाटते -(तो कागद गुरूनेच राजाला दिलेला असतो)- त्यामुळे शिपाई जमीनदाराला अटक करण्यास येतात. अखेर चमत्कार व्हावा तसे गुरूचे खरे रूप उघडकीला आल्याने राजा जमीनदाराची सुटका, त्याची अगोदरची राजनिष्ठा लक्षात घेऊन करतो. म्हणजे जे नाटक शोकांतिका होणे स्वाभाविक असे वाटते ते सुखान्त होते.
कर्वे यांना तो अनपेक्षित शेवट पटला होता की नाही ते सांगता येणार नाही. तो त्यांनी स्वीकारला हे महत्त्वाचे. त्याच प्रमाणे त्यांनी मूळ नाटकाचे रूपांतर करताना शब्द इतके नेमके वापरले आहेत की नाटक पाच अंकी असूनही कंटाळवाणे होत नाही. मोलकरणीने जमीनदाराचे मन वळवण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. तसेच, तिने जमीनदाराची मुलगी व तिचा प्रियकर यांचे मिलन घडवून आणण्यासाठी योजलेले स्वभावस्वरूपाचे ज्ञान लक्षणीय आहे. मूळ इंग्रजी संहिता वाचली की कर्वे यांचे रूपांतराचे कौशल्य मनावर जास्त ठसते. मूळ नाटकात असलेली जमीनदाराची आई - तीही गुरूचा पक्ष धरणारी - रूपांतरातही आहे. तिचे मतपरिवर्तन जरा अचानकच झाले आहे असे दिसते, पण त्याला रूपांतरकाराचा नाईलाज होता. रूपांतराचा एक उत्तम आविष्कार असे या नाटकाचे वर्णन करता येईल.
ओळ ३०:
 
==सामाजिक नाटके==
मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरूवातसुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. [[गोविंद नारायण माडगांवकर|गोविंद.ना.माडगावकर]] यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ [[इ.स. १८५९|इ.स.१८५९]] साली प्रसिद्ध केले. पण '[[तृतीय रत्न|तृतीय रत्‍न]]' या [[इ.स. १८५५]] साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, [[जोतिराव फुले]] हे पहिले मराठी नाटककार आहेत. आपली परिवर्तनवादी [[चळवळ]] सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
 
नाटकाचे स्वरूप:-
ओळ ४२:
 
मराठी संगीत रंगभूमीला वैभवशाली परंपरा आहे.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीलाचसुरुवातीलाच [[ब्रिटिश (निःसंदिग्धीकरण)|ब्रिटिशांनी]] त्याच्या सत्तेचा पाश आवळायला सुरूवातसुरुवात केली होती. [[इ.स. १८१७|१८१७]] मध्ये [[पेशवे|पेशव्यांनी]] [[पुणे|पुणेही]] त्यांच्या ताब्यात दिले आणि [[इंग्रज|इंग्रजांचा]] एकछत्री अंमल सुरू झाला. प्रशासन चालवण्यास उपयुक्त असणारे [[इंग्रजी]] जाणणारे [[कर्मचारी]] निर्माण करण्यासाठी [[इ.स. १८५२|१८५२]] मध्ये ब्रिटिशांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाची]] स्थापना केली.
 
[[विद्यापीठ|विद्यापीठात]] शिकवण्यात आलेल्या इंग्रजी [[साहित्य|साहित्याद्वारे]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राला]] [[विल्यम शेक्सपिअर|शेक्सपिअरचा]] परिचय झाला. त्याच्या सुखात्मिका, शोकात्मिका, त्याचे [[भाषा|भाषावैभव]], त्याच्या नाटकांतील विलक्षण व्यक्तिरेखा ह्यांचे नवे दालनच मराठी माणसांसमोर खुले झाले. ह्या नाटकांनी प्रभावित होऊन अनेकांनी त्यांचे मराठीत [[अनुवाद]] केले, काहींनी रुपांतरे केली, तर काहींनी त्यावर आधारित नवीन नाटके लिहिली. एकूण झाले काय तर विद्यापिठांत शिकणाऱ्या आणि न शिकणाऱ्या अशा सर्वांपर्यंतच शेक्सपिअर पोचला.