"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १८:
|}
==राजांची कामगिरी==
[[इ.स.चे ४ थे शतक|इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या]] सुरूवातीलासुरुवातीला शिवस्कंदवर्मा या पल्लव राजाने [[कृष्णा नदी|कृष्णेपासून]] [[पेन्नार नदी|पेन्नार नदीपर्यंतचा]] प्रदेश जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणला. त्याच्यानंतरच्या विष्णूगोप या [[कांचीपुरम|कांची]]च्या पल्लव राजाचा [[समुद्रगुप्त|समुद्रगुप्ताने]] पराभव केला. पुढे दिडशे वर्षे या भागात अराजक माजले पण सिंहविष्णू अवनीसिंह या राजाने अराजकाचा नाश करून पल्लवांची सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. त्याने [[चोळ साम्राज्य|चोळांचा]] पराभव करून तोंडमंडलम जिंकले. त्याने [[कलभ्र वंश|कलभ्र]], [[पांड्य वंश|पांड्य]], [[चेर वंश|चेर]] यांचा पराभव करून [[सिलोन]]च्या राजाचाही पराभव केला. याच्यामुळेच सार्वभौमत्वाच्या चढाओढीत पल्लवांचे पदार्पण झाले.
 
सिंहविष्णू अवनीसिंहानंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा पहिला महेंद्रवर्मन याने दक्षिणेत [[तिरुचिरापल्ली]]पर्यंत आपली सत्ता वाढवली. याने ''चैत्यकारी'', ''चित्रकारपुली'', ''मत्तविलास'', ''विचित्रचित्त'' या पदव्या धारण केलेल्या होत्या. याने आपल्या कालखंडात अनेक [[मंदिर|देवळे]] बांधली. महेंद्रवाडी हे गाव वसविले व तेथे महेंद्र [[तलाव]] बांधला. त्याच तलावाच्या काठावर एक विष्णूमंदिर बांधले. याच मंदिरावरील शिलालेखात हे विटाविरहित, [[लाकूड]]विरहित, [[धातू]]विरहित व चुनाविरहित मंदिर विचित्रचित्तराजाने खोदविले असा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील [[चालुक्य]] राजांशी पहिल्या महेंद्रवर्मनाला अनेक वर्षे झगडावे लागले. चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने महेंद्रवर्मनाचा पराभव केला होता. पहिल्या महेंद्रवर्मनानंतर त्याचा पुत्र पहिला नरसिंहवर्मा गादीवर आला. त्याने [[इ.स. ६४२]] मध्ये दुसऱ्या पुलकेशीचा पराभव करून त्याला युद्धात ठार मारले. त्यानिमित्त त्याने ''महामल्ल'' व ''वातापिकोंड'' या पदव्या धारण केल्या. सिलोनवर दोनदा नाविक स्वाऱ्या केल्या होत्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/पल्लव_वंश" पासून हुडकले